vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आता फक्त माणसं सुधारण्याची गरज: रावसाहेब दानवेविल्हाडीच्या बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन..

आता फक्त माणसं सुधारण्याची गरज: रावसाहेब दानवेविल्हाडीच्या बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन..

 

बदनापूर / जालना (प्रतिनिधी) :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार शेतीवर मोठ्या प्रमाणात खर्च करत असून तालुका , जिल्हा ,राज्य आणि देश सुधारले, आता फक्त माणसं सुधारण्याची गरज आहे,असे मत माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केले.

आशयघन प्रकाशनाचे शालेय विद्यार्थ्यांच्या रचित कवितांचे विनोदकुमार पांडे संपादित “विल्हाडीच्या बालकविता” संग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र दिनी गुरुवारी ( ता. 01)

जिल्हा परिषद शाळेच्या सभागृहात रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भावकवयित्री डॉ.संजीवनी तडेगांवकर ,आशयघन प्रकाशनाचे पंडितराव तडेगांवकर,रोटरी क्लब ऑफ जालनाचे रो. दीपक बगडिया,सचिव रो. रवी भक्कड,सरपंच ममता इनामे, शालेय समिती अध्यक्ष भगवान कान्हेरे, संजय खरात, मुख्याध्यापक विष्णू सोनटक्के, ज्ञानेश्वर इनामे,विनोद कुमार पांडे ,ग्रा.पं.व शालेय समितीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

रावसाहेब पाटील दानवे यावेळी म्हणाले, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या गळतीचे वाढलेले प्रमाण हे चिंताजनक असून बालवयातच शिक्षणाप्रती गोडी निर्माण करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य वळण देण्याचे काम गुरुजींनी करावे असे आवाहन त्यांनी केले. प्रकाशित पुस्तकाचे मुखपृष्ठ ,शीर्षक, सुलेखन, रेखाटने येथील विद्यार्थ्यांचे असल्याबद्दल दानवे यांनी समाधान व्यक्त केले.

डॉ. संजीवनी तडेगांवकर यांनी ग्रंथावर भाष्य करताना धडपडणारे, व्यासंग असणारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची योग्य किंमत करतात, असे सांगून काव्यसंग्रहात विद्यार्थ्यांमधील प्रतिभा आणि शब्दांची ताकद उमटली आहे असे त्यांनी सांगितले.

पंडितराव तडेगांवकर यांनी कविता प्रकार हा अवघड असला तरी भावना व्यक्त करण्यासाठी सोपा आहे. विद्यार्थ्यांनी आपलं भोवताल कवितेत ठळकपणे मांडले असे त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविकात विनोदकुमार पांडे यांनी प्रशिक्षणा दरम्यान डॉ.संजीवनी तडेगावकर यांच्या मार्गदर्शना मुळेच आपल्याला प्रेरणा मिळाली असे स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला ग्रामस्थांचे बहुमोल सहकार्य लाभले असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ जालनाच्या वतीने शाळेत बसवण्यात आलेल्या फरशा ,गट्टूंचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी वेणू कान्हेरे, कमल क्षीरसागर यांच्या सह विद्यार्थ्यांनी कवितांचे सादरीकरण केले. मुख्याध्यापक विष्णू सोनटक्के यांनी आभार मानले.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक श्रीकांत अगमे,शिवहरी मेहेत्रे ,प्रकाश बंड ,शिवाजी तिडके, दत्ता वड्डे, विठ्ठल कान्हेरे, काकासाहेब खरात, लोखंडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक ,पालक ,आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

0000000

 

_________

संबंधित पोस्ट

महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी घेतला सर्वसाधारण सभेतील मंजूर ठरावांवरील कार्यवाहीचा आढावा

vishwatmaklokswamivarta

१० मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

भारतीय राज्यघटनेची उद्देशिका जिल्ह्यातील १० लाख घरांपर्यंत पोहोचवू – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते “घर घर संविधान” उपक्रमाचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात मुसळधार, ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी,३५४ नागरिकांची पुराच्या वेढ्यातून सुटका; प्रशासन सतर्क मुख्यमंत्री फडणवीस जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात..

vishwatmaklokswamivarta

३० एप्रिल रोजी कर्ज वाटप व स्वयंरोजगारमेळावामेळाव्यात लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-मंत्री अतुल सावे .

vishwatmaklokswamivarta

कविता या स्त्रीलिंगी शब्दात मोठी ताकद : रोहिदास पोट