vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे-बेलापूर रोड काँक्रिटीकरणच्या कामासाठी 14 मे पर्यंत वाहतूकीसाठी बंद; पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

ठाणे-बेलापूर रोड काँक्रिटीकरणच्या कामासाठी 14 मे पर्यंत वाहतूकीसाठी बंद; पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

 

नवी मुंबई प्रतिनिधी –

नवी मुंबई मध्ये ट्राफिक विभागाकडून रस्त्याच्या काँक्रिटीकरणच्या  कामासाठी ठाणे-बेलापूर रोड  14 मेच्या मध्यरात्रीपर्यंत पूर्णबंद बंद ठेवला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आयकिया जवळ रस्त्याचे काम असल्याने पुढील काही दिवस नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्त्याचे हे काम सध्या नवी मुंबई महानगरपालिकेकडून  हाती घेण्यात आले आहे.

रस्त्याच्या कामामुळे सध्या सविता केमिकल ते तुर्भे रेल्वे स्टेशन पर्यंतचा रस्ता वाहतूकीसाठी काही विशिष्ट काळासाठीच सुरू ठेवला जाणार आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आता पर्यायी मार्ग सूचवण्यात आले आहेत. हलक्या वाहनांना महापे येथील अग्निशमन दलाच्या सिग्नलवरून वळून जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर सेक्टर 26 एपीएमसी आणि पाम बीच रोडवरून पुढे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अवजड वाहनांसाठी, दोन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. वाहनचालक अग्निशमन दलाच्या सिग्नलवरून डावीकडे वळून तुर्भे एमआयडीसी परिसरातून जाऊ शकतात किंवा सविता केमिकल पुलाखाली डावीकडे वळून त्याच एमआयडीसी मार्गाचा वापर करू शकतात

नवी मुंबईतील पायाभूत सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मोठ्या नागरी उपक्रमांचा एक भाग म्हणून हा रस्ता बंद करण्यात येत आहे. ठाणे-बेलापूर रोड सारख्या जास्त रहदारी असलेल्या क्षेत्रांना प्राधान्य देत, नवी मुंबई महानगरपालिका मान्सूनपूर्व रस्ते मजबूतीकरण आणि पुनर्बांधणी उपक्रम हाती घेत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला कामाचे वेळापत्रक ठरवून, अधिकाऱ्यांचा उद्देश पावसाळा सुरू होण्यापूर्वी काँक्रिटीकरण पूर्ण करणे, रस्त्यांचे नुकसान होण्याचा धोका कमी करणे आणि दीर्घकालीन टिकाऊपणा सुनिश्चित करणे आहे.

संबंधित पोस्ट

योग दिनानिमित्त योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम व पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात येणार,सर्व ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांचे सहकार्य घेण्यात येणार  — मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले     

पनवेल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

दरवर्षीप्रमाणे निलेश सांबरे यांच्याकडून ३०० मोफत बसमधून १५ हजार वारकरी भाविकांना पंढरपूर वारी…

आपल्या संस्कृतीला नवकार महामंत्र निश्चितच सर्वव्यापी करतो. नवकार महामंत्रामध्ये विश्व कल्याणची शक्ती असून विश्वशांतीसाठी या महामंत्राच्या जपाचा निश्चितच सकारात्मक परिणाम होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

महिला व बालविकास मंत्रालयाकडून ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’साठी अर्ज आमंत्रितअर्ज स्वीकारण्यास 1 एप्रिल 2025 पासून सुरुवात, अंतिम मुदत 31 जुलै 2025

vishwatmaklokswamivarta

महसूल कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या संधीचा उपयोग सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करावा-जिल्हाधिकारी आंचल गोयल