vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे-बेलापूर रोड काँक्रिटीकरणच्या कामासाठी 14 मे पर्यंत वाहतूकीसाठी बंद; पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

ठाणे-बेलापूर रोड काँक्रिटीकरणच्या कामासाठी 14 मे पर्यंत वाहतूकीसाठी बंद; पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

 

नवी मुंबई प्रतिनिधी –

नवी मुंबई मध्ये ट्राफिक विभागाकडून रस्त्याच्या काँक्रिटीकरणच्या  कामासाठी ठाणे-बेलापूर रोड  14 मेच्या मध्यरात्रीपर्यंत पूर्णबंद बंद ठेवला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आयकिया जवळ रस्त्याचे काम असल्याने पुढील काही दिवस नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्त्याचे हे काम सध्या नवी मुंबई महानगरपालिकेकडून  हाती घेण्यात आले आहे.

रस्त्याच्या कामामुळे सध्या सविता केमिकल ते तुर्भे रेल्वे स्टेशन पर्यंतचा रस्ता वाहतूकीसाठी काही विशिष्ट काळासाठीच सुरू ठेवला जाणार आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आता पर्यायी मार्ग सूचवण्यात आले आहेत. हलक्या वाहनांना महापे येथील अग्निशमन दलाच्या सिग्नलवरून वळून जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर सेक्टर 26 एपीएमसी आणि पाम बीच रोडवरून पुढे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अवजड वाहनांसाठी, दोन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. वाहनचालक अग्निशमन दलाच्या सिग्नलवरून डावीकडे वळून तुर्भे एमआयडीसी परिसरातून जाऊ शकतात किंवा सविता केमिकल पुलाखाली डावीकडे वळून त्याच एमआयडीसी मार्गाचा वापर करू शकतात

नवी मुंबईतील पायाभूत सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मोठ्या नागरी उपक्रमांचा एक भाग म्हणून हा रस्ता बंद करण्यात येत आहे. ठाणे-बेलापूर रोड सारख्या जास्त रहदारी असलेल्या क्षेत्रांना प्राधान्य देत, नवी मुंबई महानगरपालिका मान्सूनपूर्व रस्ते मजबूतीकरण आणि पुनर्बांधणी उपक्रम हाती घेत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला कामाचे वेळापत्रक ठरवून, अधिकाऱ्यांचा उद्देश पावसाळा सुरू होण्यापूर्वी काँक्रिटीकरण पूर्ण करणे, रस्त्यांचे नुकसान होण्याचा धोका कमी करणे आणि दीर्घकालीन टिकाऊपणा सुनिश्चित करणे आहे.

संबंधित पोस्ट

रस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन, अतिक्रमणमुक्ती उपक्रमाची सांगली अपर तहसीलदार कार्यालयामार्फत प्रभावी अंमलबजावणी- 194 पाणंद रस्त्यांच्या नोंदी, 350 शिवार रस्त्यांचे सर्वेक्षण, 2210 जातीचे दाखले वाटप..

महाराष्ट्र महापौर परिषदेची २३ वी बैठक अंधेरी, मुंबई येथे महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

vishwatmaklokswamivarta

श्रीक्षेत्र पुष्कराणी परिसरात बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क सुरक्षा उपाययोजना करण्याचे जिल्हा प्रशासनाचे निर्देश

प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या    पाळीव किंवा भटके प्राणी, पक्ष्यांना सुका, ओला रंग लावू नका

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे हरभरा नोंदणीस १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ !आ.मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या पाठपुराव्याला मिळाले यश,

निलंगा ते उदगीर मार्गावर मंजूर बस फेऱ्यासोबत शिवशाही बसच्या जादा फेऱ्या