vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत 

सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत

लातूर, प्रतिनिधी : शासनाने सन 2025-26 पासून खरीप हंगामासाठी सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अधिसूचित पिकांसाठी विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी 31 जुलै 2025 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पिक पाहणी आणि फार्मर आयडी अनिवार्य आहे. ही योजना लातूर जिल्ह्यातील अधिसूचित मंडळांमधील अधिसूचित पिकांसाठी लागू असून, कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे.

योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी विमा हप्ता दर 2 टक्के आणि नगदी पिकांसाठी, विशेषतः कापसासाठी 3 टक्के निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये सोयाबीन पिकासाठी 70 टक्के जोखीम स्तरावर 58,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम असून, शेतकऱ्यांना 1,160 रुपये हप्ता भरावा लागेल. तूर पिकासाठी 70 टक्के जोखीम स्तरावर 41,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आणि 820 रुपये हप्ता आहे. मूग आणि उडीद पिकांसाठी 70 टक्के जोखीम स्तरावर प्रत्येकी 25,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आणि 500 रुपये हप्ता आहे. खरीप ज्वारीसाठी 70 टक्के जोखीम स्तरावर 29,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आणि 580 रुपये हप्ता आहे. कापसासाठी 70 टक्के जोखीम स्तरावर 57,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आणि 1,710 रुपये हप्ता आहे. तर बाजरीसाठी 70 टक्के जोखीम स्तरावर 26,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आणि 520 रुपये हप्ता आहे.ही योजना लातूर जिल्ह्यात आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्यामार्फत राबविली जाणार आहे.

अवैध मार्गाने विमा काढल्यास अर्ज रद्द होईल, तसेच बोगस विमा आढळल्यास संबंधित शेतकऱ्याचा आधार क्रमांक पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्यांनी नजीकच्या बँक किंवा नागरी सुविधा केंद्रामार्फत पीक विमा प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 ऐवजी आता 11 माहिने…

कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी क्षमता वृद्धी महत्त्वाची’क्षमता वृद्धी व जनजागृती कार्यशाळेमध्ये तज्ज्ञांचे मत..

vishwatmaklokswamivarta

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते 26 एप्रिल रोजी ठाणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन…

महात्मा ज्योतीबा फुले सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप…

पोलिसांच्या अनुकंपा नियुक्त्यांचा निर्णय मिशन मोडवर राबविला जाणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस