vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज दि .4 जुलै रोजी मुंबईत**गेटवे ऑफ इंडिया जवळ कॅन्डल मार्च**केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले नेतृत्व करणार*

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज दि .4 जुलै रोजी मुंबईत**गेटवे ऑफ इंडिया जवळ कॅन्डल मार्च**केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले नेतृत्व करणार*

 मुंबई प्रतिनिधी ~ अहमदाबाद मध्ये एयर इंडियाच्या जंबो जेट विमान अपघातात 240 लोक मृत्युमुखी पडले. या अत्यंत भीषण अपघातात मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वात आज सायंकाळी 6वाजता मुंबईत रेडिओ क्लब ते गेट वे ऑफ इंडिया असा कॅन्डल मार्ग काढण्यात येणार आहे.या कॅन्डल मार्च मध्ये बॉलिवूड चे अनेक सेलिब्रिटी कलाकार उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी अभिनेत्री संगीता कापूरे आणि अभिनेते गौरव शर्मा हे प्रयत्नशील आहेत.या कॅन्डल मार्च मध्ये मुंबईतील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनीही केले आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे आयोजित या कॅन्डल मार्च च्या नियोजनाची बैठक बांद्रा येथे आज घेण्यात आली.त्यात रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे;मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक पवार; खजिनदार सुनील मोरे जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे; जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड;प्रकाश जाधव संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

रिपब्लिकन पक्षाने आयोजित केलेल्या कॅन्डल मार्चा ला आज  सायंकाळी 6 वाजता मुंबईत रेडिओ एन क्लब येथून सुरुवात होणार असून. गेट वे ऑफ इंडिया येथे समारोप करण्यात येणार आहे.या कॅन्डल मार्च मध्ये अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना रिपब्लिकन पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.या कॅन्डल मार्च चे नेतृत्व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले करणार आहेत.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर;राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे अभिनेत्री संगीता कपूरे गौरव शर्मा सिद्धार्थ कासारे सर्व रिपब्लिकन जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रिपाइं तर्फे देण्यात आली आहे.

0000

 

संबंधित पोस्ट

अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी15 कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

vishwatmaklokswamivarta

रायगडातील ग्रामपंचायतींच्या घरपट्टी वसुलीत लक्षणीय वाढ-समृद्ध पंचायत राज अभियानादरम्यात तीन महिन्यात 90.77 कोटींची वसुली…

vishwatmaklokswamivarta

vishwatmaklokswamivarta

मोटार वाहन कर अधिनियमात सुधारणा

गोवंश हत्येच्या विरोधात कठोर कार्यवाही व्हावी, अनधिकृत कत्तलखाने बुलडोझर लाऊन उखडून टाकावे व पूर्ण बंद करण्यात यावे – पोलिस प्रशासनाला निवेदन

vishwatmaklokswamivarta

पहलगाम येथील दहशतवादी हल्ला प्रकरणी जिल्हा नियंत्रण कक्ष-कार्यान्वित; संपर्क साधण्याचे आवाहन