vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात “राष्ट्रासाठी मध्यस्थी” विशेष मोहिमेला सुरुवात वाद नको, संवाद हवा! मध्यस्थीने सुटते गुंतागुंत, नाती राहतात जिवंत!

जिल्ह्यात “राष्ट्रासाठी मध्यस्थी” विशेष मोहिमेला सुरुवात वाद नको, संवाद हवा! मध्यस्थीने सुटते गुंतागुंत, नाती राहतात जिवंत!

रायगड ( प्रतिनिधी : न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांमध्ये संवाद व सामंजस्याच्या माध्यमातून तडजोड साधण्यासाठी “राष्ट्रासाठी मध्यस्थी” (Mediation for the Nation) ही विशेष मोहिम रायगड जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार ही मोहिम दिनांक ०१ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत जिल्हा न्यायालय रायगड व सर्व तालुका न्यायालयांमध्ये राबविली जात आहे.

या मोहिमेंतर्गत कौटुंबिक वाद, मोटार अपघात नुकसानभरपाई, धनादेश न भरल्याच्या (चेक बाऊन्स) तक्रारी, वाटप दावे, वाणिज्यिक दावे तसेच इतर सर्व तडजोडयोग्य दिवाणी व फौजदारी प्रकरणे सामंजस्याच्या माध्यमातून निकालात काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

मध्यस्थी ही न्यायालयीन प्रक्रियेपेक्षा जलद, खर्चिकदृष्ट्या कमी व गोपनीयता जपणारी पद्धत असून, यात कोणत्याही पक्षावर निर्णय लादला जात नाही. न्यायालयात प्रलंबित असलेल्या व तडजोडीयोग्य असलेल्या प्रकरणांमध्ये दोन्ही पक्ष आपसात थेट संवाद साधून सुसंवादातून आपली समस्या सोडवू शकतात.

या मोहिमेचे मार्गदर्शन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली होत असून, मोहिमेचा लाभ जास्तीत जास्त पक्षकारांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.मध्यस्थी मोहिमेची वैशिष्ट्ये: स्वेच्छिक सहभाग,गोपनीयता राखली जाते,वेळ आणि खर्च वाचतो,सामंजस्यातून निर्णय,

 न्यायालयीन प्रक्रियेपेक्षा जलद ज्या पक्षकारांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत व ते ही प्रकरणे सामंजस्यातून मिटवू इच्छितात, त्यांनी जिल्हा न्यायालय रायगड, तालुका न्यायालय किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग येथे तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती तेजस्विनी निराळे यांनी केले आहे.

००००

संबंधित पोस्ट

मराठवाड्यात जोरदार पावसाने शेतकरी संकटात

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी* 

जीबीएस आजाराच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेने अलर्ट रहावे- पालकमंत्री शंभूराज देसाई,पाण्याचे नमुने सातत्याने तपासावेत नागरिकांनी दुषीत अन्न व पाणी टाळाव लक्षणे आढळल्यास त्वरीत तपासणी करुन घ्यावी सर्व आरोग्य केंद्रांवर पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा…

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्यांक आयुक्तालय स्थापना करून एक वर्ष झालं परंतु  उपायुक्त सहाय्यक आयुक्त एकूण 36 जागा भरल्या नाहीत ह्या रिक्त जागा तात्काळ भरण्यात यावा अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ची मागणी.

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर अभियानातंर्गत बैठकअधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कामे करावीत- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्ह्यात 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान

समृद्धी महामार्ग अपघात : आठ मृतांच्या कुटुंबीयांना ४० लाखांची मदत-मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी रुपये ५ लाख रूपये