vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात “राष्ट्रासाठी मध्यस्थी” विशेष मोहिमेला सुरुवात वाद नको, संवाद हवा! मध्यस्थीने सुटते गुंतागुंत, नाती राहतात जिवंत!

जिल्ह्यात “राष्ट्रासाठी मध्यस्थी” विशेष मोहिमेला सुरुवात वाद नको, संवाद हवा! मध्यस्थीने सुटते गुंतागुंत, नाती राहतात जिवंत!

रायगड ( प्रतिनिधी : न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांमध्ये संवाद व सामंजस्याच्या माध्यमातून तडजोड साधण्यासाठी “राष्ट्रासाठी मध्यस्थी” (Mediation for the Nation) ही विशेष मोहिम रायगड जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार ही मोहिम दिनांक ०१ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत जिल्हा न्यायालय रायगड व सर्व तालुका न्यायालयांमध्ये राबविली जात आहे.

या मोहिमेंतर्गत कौटुंबिक वाद, मोटार अपघात नुकसानभरपाई, धनादेश न भरल्याच्या (चेक बाऊन्स) तक्रारी, वाटप दावे, वाणिज्यिक दावे तसेच इतर सर्व तडजोडयोग्य दिवाणी व फौजदारी प्रकरणे सामंजस्याच्या माध्यमातून निकालात काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

मध्यस्थी ही न्यायालयीन प्रक्रियेपेक्षा जलद, खर्चिकदृष्ट्या कमी व गोपनीयता जपणारी पद्धत असून, यात कोणत्याही पक्षावर निर्णय लादला जात नाही. न्यायालयात प्रलंबित असलेल्या व तडजोडीयोग्य असलेल्या प्रकरणांमध्ये दोन्ही पक्ष आपसात थेट संवाद साधून सुसंवादातून आपली समस्या सोडवू शकतात.

या मोहिमेचे मार्गदर्शन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली होत असून, मोहिमेचा लाभ जास्तीत जास्त पक्षकारांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.मध्यस्थी मोहिमेची वैशिष्ट्ये: स्वेच्छिक सहभाग,गोपनीयता राखली जाते,वेळ आणि खर्च वाचतो,सामंजस्यातून निर्णय,

 न्यायालयीन प्रक्रियेपेक्षा जलद ज्या पक्षकारांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत व ते ही प्रकरणे सामंजस्यातून मिटवू इच्छितात, त्यांनी जिल्हा न्यायालय रायगड, तालुका न्यायालय किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग येथे तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती तेजस्विनी निराळे यांनी केले आहे.

००००

संबंधित पोस्ट

देशभक्तीचा उत्साह, ऐक्य आणि राष्ट्रीय अभिमानाची अनुभूतीभारत माता स्तुतीच्या गौरव दिनानिमित्त वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन..

vishwatmaklokswamivarta

पुणे येथे 4, 18 एप्रिल आणि 2 मे रोजी महसूल अदालत

उद्योजकता विकास प्रशिक्षणातून महिलांचे सक्षमीकरण- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- उद्योजकता विकास प्रशिक्षणात 900 महिला सहभागी – जिल्हा वार्षिक योजनेतून 1 कोटी 62 लाखांची तरतूद

लोकसहभागातून गावांचा विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘रणजीतबाबू देशमुख ग्रामविकास पुरस्कार-२०२६’ चे वितरण

गुजरात मधील बनासकाठा येथे एका फटाके कारखान्यात भीषण आग लागली, ज्यात बॉईलर फुटल्याने मोठा स्फोट झाला आणि 17 जणांचा बळी गेला, तर 3 जण बेपत्ता आहेत.

महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन-२०२६ कार्यशाळा संपन्न