
भारत कौशल्य स्पर्धेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन
सातारा प्रतिनिधी :- राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेच्या माध्यमातून भारत कौशल्य स्पर्धा २०२६-२७ या देशातील सर्वात प्रतिष्ठित कौशल्य स्पर्धेसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जात असून, विविध व्यावसायिक व तांत्रिक तसेच इतर कौशल्यांमध्ये २३ वर्षांखालील युवक-युवतींना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाते.
जिल्हास्तर, विभागस्तर आणि राज्यस्तरावरील निवड प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना राष्ट्रीय स्तरावरील भारत कौशल्य २०२६-२७ मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार असून, त्यानंतर जागतिक स्तरावरील जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त होणार आहे.



