vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भारत कौशल्य स्पर्धेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

भारत कौशल्य स्पर्धेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

 

सातारा प्रतिनिधी :- राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेच्या माध्यमातून भारत कौशल्य स्पर्धा २०२६-२७ या देशातील सर्वात प्रतिष्ठित कौशल्य स्पर्धेसाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जात असून, विविध व्यावसायिक व तांत्रिक तसेच इतर कौशल्यांमध्ये २३ वर्षांखालील युवक-युवतींना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाते.

 

जिल्हास्तर, विभागस्तर आणि राज्यस्तरावरील निवड प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना राष्ट्रीय स्तरावरील भारत कौशल्य २०२६-२७ मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार असून, त्यानंतर जागतिक स्तरावरील जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त होणार आहे.

 

जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कौशल्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर झळाळी देण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी https://www.skillindiadigital.gov.in/home या वेबसाईटवर भेट द्या अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तळमजला, नवीन प्रशासकीय इमारत, ०२१६२ २३९९३८ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अमिता पवार यांनी केले आहे.

000

संबंधित पोस्ट

लातूर ग्रामीणच्या विकासपर्वाचे शिल्पकार आदरणीय आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा…👏🏻🎂🎊

गुजरातमधील थर वाळवंटातील सर्वात मोठं नैसर्गिक जलस्थळ नळसरोवर इथं दुर्मीळ आर्क्टिक पक्षी ‘सॅबिन्स गल’ दिसून आला आहे! 🐦❄️

आज भारतात बनवलेली पहिली युद्धनौका 🇮🇳 INS अर्नाला नौदलात सामील!

जागतिक महिला दिनानिमित्त बॅंक ऑफ महाराष्ट्र,ठाणे अंचल कार्यालयातर्फे महिला मेळावा संपन्नमेळाव्यामध्ये एकूण 52 बचतगटांना 2 कोटी 65 लाख रुपयांचे कर्जवाटप..

मायेची ऊब हरवलेल्या चिमुकल्यांना दिल्लीच्या सहलीची अनोखी भेट ! महाराष्ट्र सदनात रंगला भावपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

लोकं नाही तर गडचिरोलीचा विकास धावत आहे – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल**गडचिरोली महामॅरेथॉनमध्ये १४ हजार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग*

vishwatmaklokswamivarta