vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ऊर्जा विभागाने वीजनिर्मिती व खर्चाबाबत योग्य नियोजन केल्यास ग्राहकांना माफक दरात वीज वितरण शक्य होणार असल्याचे सांगत सबसिडीसाठी लागणारे अनुदान लवकरात लवकर वितरीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ऊर्जा विभागाने वीजनिर्मिती व खर्चाबाबत योग्य नियोजन केल्यास ग्राहकांना माफक दरात वीज वितरण शक्य होणार असल्याचे सांगत सबसिडीसाठी लागणारे अनुदान लवकरात लवकर वितरीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य प्रतिनिधी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन येथे ऊर्जा विभागाची आढावा बैठक घेतली. #ऊर्जा विभागाने #वीजनिर्मिती व खर्चाबाबत योग्य नियोजन केल्यास ग्राहकांना माफक दरात वीज #वितरण शक्य होणार असल्याचे सांगत सबसिडीसाठी लागणारे अनुदान लवकरात लवकर वितरीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी वित्त विभागाला दिले.

ऊर्जा विभागाला सन २०२५-२६ या वर्षासाठी लागणारा निधी, विविध विभागांची वीज देयके #थकबाकी, #अनुदान वितरणाची सद्यस्थिती, विविध योजनांसाठी केलेली निधीची तरतूद, मेडामार्फत करण्यात आलेली कार्यवाही याचा आढावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला.

राज्यातील वीज वितरण व्यवस्थेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक तेथे नियमांनुसार बदल करावेत. थकबाकी वेळेत वसुल होण्यासाठी कार्यवाही करावी. महावितरणला मंजूर झालेला आर्थिक वर्षाचा निधी आणि तूट याची तफावत वाढू नये, याची खबरदारी घ्यावी. ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’, ‘पीएम कुसुम योजना’ प्रभावीपणे राबविण्यासाठी निधीची आवश्यकता असून ऊर्जा विभागाने सादर केलेली मागणी वित्त विभागाने विचारात घ्यावी. सर्वसामान्य वीज ग्राहकांना दिलासा मिळेल असे दर ठरविण्यासाठी योग्य त्या उपाययोजनाही करणे आवश्यक आहे – मुख्यमंत्री

या बैठकीला अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

जालना शहरात श्रीराम मंदिरात महाआरती भव्यतेने संपन्न श्री राममंदिराचा क्षण हा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २६ एप्रिल रोजी; पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा..

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत एक दिवस गावकऱ्यासोबत उपक्रमाचा शुभारंभ विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी साधला ग्रामस्थांशी संवाद

पाणी पेटलं! तहानलेल्या गावांसाठी घाटगे पाटलांचा एल्गार, अधिकाऱ्यांची बोलती बंद!गोदावरी नदीवरील कॅनॉल दरवाजे उघडून शेतकऱ्यांसाठी सोडले पाणी….

एक दिवस सैनिकांसाठी’अभियान राबविणार    -जिल्हाधिकारी आशिष येरेकर-सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा संपन्न

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न !