vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे कृषि विभागाकडून आवाहन*

*प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे कृषि विभागाकडून आवाहन*

सातारा प्रतिनिधी: याप्रमाणे भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद व खरीप कांदा या 9 पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू आहे. 15 जुलै अखेर जिल्ह्यातील केवळ 2400 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्यामध्ये पावसाच्या संततधारेमुळे बहुतांश ठिकाणी मशागतीची व पेरणीची कामे खोळंबली आहेत. ज्या ठिकाणी पेरणी झालेली आहे. तेथील पिकाचे सततच्या पावसाने नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग, इत्यादी कारणाने नुकसान झाल्यास शेतकऱ्याचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलै अखेर या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सातारचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अजय शेंडे यांनी केले आहे.

बिगर कर्जदार शेतकरी वैयक्तीकरित्या आपले अर्ज विमा कंपनीस सादर करुन अथवा विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारेही या योजनेत सहभागी होऊ शकतील योजनेत सहभागी योजण्यासाठी आवश्यक विहीत नमुन्यातील अर्ज बँकेकडे व विमा कंपनीकडे उपलब्ध असून शेतकऱ्यांनी ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आपले खाते आहे. त्या बँकेत जाऊन अथवा पोस्ट कार्यालय, विमा कंपनी एजंट किंवा सर्वाजनिक सुविधा केंद्र व विमा कपंनीच्या संकेतस्थळाद्वारे 31 जुलै 2025 पूर्वी हप्ता भरावा. अधिक माहिती साठी गावपातळीवरील सहाय्यक कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

टाटा स्टीलमध्ये मोठ्या स्फोटानंतर भीषण आग, अनेक कामगार जखमी

vishwatmaklokswamivarta

मागासवर्गीय मुलींसाठी मोताळा येथील वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदभरती; समुपदेशनासाठी यादी संकेतस्थळावर येणार

vishwatmaklokswamivarta

तृतीयपंथीयांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी सामाजिक संस्थांना 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

लेखी आश्वासनानंतर बच्चू कडू यांचे उपोषण मागे..

जागतिक कौशल्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीत अमरावतीची बाजी,विजेत्यांच्या जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते सत्कार चार विजेत्यांनी उंचावला जिल्ह्याचा नावलौकिक…

vishwatmaklokswamivarta