vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रेशन कार्डसाठी ई-केवायसी बंधनकारक

रेशन कार्डसाठी ई-केवायसी बंधनकारक..

राज्य प्रतिनिधी

महाराष्ट्रशासनाच्या अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मोफत धान्याचा लाभ घेत असलेल्या रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही, तर त्यांचा मोफत धान्य मिळण्याचा हक्क रद्द केला जाईल, असा इशारा अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिला आहे.

राज्यातील अपात्र लाभार्थ्यांना योजनेपासून दूर ठेवण्यासाठी शासनाने ई-केवायसी बंधनकारक केली आहे. आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक तपासणीद्वारे लाभार्थ्यांची ओळख निश्चित केली जाते. या प्रणालीमुळे फक्त पात्र कुटुंबांनाच अनुदानित धान्य दिले जाणार आहे, ज्यामुळे लाभाचा गैरवापर टाळता येणार आहे.

नाशिक जिल्ह्यात अजूनही अनेक रेशन कार्डधारकांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे त्यांचे रेशन कार्ड ‘अपात्र’ ठरवले जाऊ शकते. अनेक गरीब आणि गरजू नागरिकांना याचा फटका बसण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांनी तत्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे.

ई-केवायसी करण्यासाठी लाभार्थ्यांनी जवळच्या शिधावाटप दुकानात जाऊन आधार क्रमांक आणि अंगठा स्कॅन करून आपली नोंदणी पूर्ण करावी लागते. याशिवाय, काही ठिकाणी ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध आहेत. स्थानिक पुरवठा कार्यालयांमध्येही सहाय्यक कर्मचारी ई-केवायसीसाठी मदत करत आहेत.

प्रत्येक लाभार्थ्याने आपली शिधापत्रिका आणि ओळख दस्तऐवज घेऊन वेळेत ई-केवायसी पूर्ण करावी, अन्यथा योजनेचा लाभ पुढे मिळणार नाही. कोणतीही गैरसमज किंवा तांत्रिक अडचण टाळण्यासाठी शासनाच्या अधिकृत केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

शिक्षण आणि तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागाचा कायापालट शक्य- उपराष्ट्रपती जगदीप धनखड· विकसित भारत केवळ स्वप्न नव्हे तर निश्चित साध्य· के.पी.बी हिंदुजा महाविद्यालयाचा अमृत महोत्सव

जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परीक्षा मार्गदर्शन शिबिर व सत्कार सोहळा संपन्न,स्पर्धा परीक्षेची तयारी करताना स्वयंप्रेरणा महत्त्वपूर्ण  -जिल्हाधिकारी आशिष येरेकर

औद्योगिक प्रयोजनासाठी अकृषिक सनदीची आवश्यकता नाही-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची माहिती · शासन परिपत्रक जारी ; उद्योग घटकांना दिलासा

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक *२७ वर्षे खटला प्रलंबित राहिल्याने न्यायालयात आत्महत्या: ५ कोटी खटले, ३२४ वर्षांची प्रतीक्षा**‘तारीख पे तारीख’ कधीपर्यंत; नामदेव जाधवांना न्याय कधी मिळणार ? – श्री. अभय वर्तक, सनातन संस्था

vishwatmaklokswamivarta

एपीटी ॲप्लिकेशन प्रणालीसाठी आज पोस्टल व्यवहार बंद

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस   सुरू लोकल ट्रेन दहा-पंधरा उशिर, मेट्रोपासून सगळ्या गाड्यांच्या हेडलाईट्स ऑन, मुसळधार पाऊसच पाऊस …