vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रेशन न घेतल्यास रेशनकार्ड होणार रद्द

रेशन न घेतल्यास रेशनकार्ड होणार रद्द

राज्य प्रतिनिधी -केंद्र सरकारने रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन सुधारित आदेशानुसार, सलग सहा महिन्यांपर्यंत रेशन न घेतलेल्या कार्डधारकांचे रेशनकार्ड आता निष्क्रिय करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सुधारित आदेश २२ जुलै २०२५ पासून लागू करण्यात आला आहे.

हा आदेश देशभरातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना बंधनकारक आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अधिकाऱ्यांना दर सहा महिन्यांनी अशा निष्क्रिय कार्डधारकांची यादी दिली जाणार आहे. यादीतील नावांवर पुढील तीन महिन्यांत घरोघरी जाऊन सत्यापन केले जाईल. त्या दरम्यान कार्डधारकांनी स्वतःची ओळख आणि पात्रता अधोरेखित करणारी माहिती व कागदपत्रे सादर करावी लागतील

: या प्रक्रियेनंतरही जर पात्रता निश्चित झाली नाही, तर अशा कार्डधारकांचे रेशन पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. सरकारचा उद्देश म्हणजे फक्त खरोखर गरजू आणि पात्र नागरिकांनाच रेशनचा लाभ मिळावा.

देशात सध्या जवळपास तेवीस कोटी रेशनकार्डधारक आहेत. त्यापैकी सात ते अठरा टक्के कार्डधारक हे रेशन न घेणारे, स्थलांतरित, मृत व्यक्तींच्या नावे असलेले किंवा बनावट कार्डधारक असू शकतात, असे प्रशासनाचे निरीक्षण आहे.

तसेच, केंद्र सरकारने आदेश दिला आहे की प्रत्येक कार्डधारकाची पाच वर्षांनी एकदा तरी पूर्ण छाननी केली जावी. त्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सक्तीची करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास कार्ड रद्द होऊ शकते.

संबंधित पोस्ट

कोकणाचा जलदगतीने विकास करण्यासाठी रस्ते, महामार्ग उभारणार *– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नवी मुंबई, वाशी येथील सिडको ऑडिटोरियम येथे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित “नशामुक्त नवी मुंबई” अभियानाचे उद्घाटन संपन्न

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

जागतिक पर्यावरण दिन विशेष पोफळेकरांचे ‘सुर्याय नमः’‘पोफळा’ ठरले मराठवाड्यातील पहिले सौरऊर्जा ग्राम..

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने नियोजन करणे आवश्यक—-जिल्हाधिकारी किशन जावळे*