vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रेशन न घेतल्यास रेशनकार्ड होणार रद्द

रेशन न घेतल्यास रेशनकार्ड होणार रद्द

राज्य प्रतिनिधी -केंद्र सरकारने रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नवीन सुधारित आदेशानुसार, सलग सहा महिन्यांपर्यंत रेशन न घेतलेल्या कार्डधारकांचे रेशनकार्ड आता निष्क्रिय करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सुधारित आदेश २२ जुलै २०२५ पासून लागू करण्यात आला आहे.

हा आदेश देशभरातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना बंधनकारक आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अधिकाऱ्यांना दर सहा महिन्यांनी अशा निष्क्रिय कार्डधारकांची यादी दिली जाणार आहे. यादीतील नावांवर पुढील तीन महिन्यांत घरोघरी जाऊन सत्यापन केले जाईल. त्या दरम्यान कार्डधारकांनी स्वतःची ओळख आणि पात्रता अधोरेखित करणारी माहिती व कागदपत्रे सादर करावी लागतील

: या प्रक्रियेनंतरही जर पात्रता निश्चित झाली नाही, तर अशा कार्डधारकांचे रेशन पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. सरकारचा उद्देश म्हणजे फक्त खरोखर गरजू आणि पात्र नागरिकांनाच रेशनचा लाभ मिळावा.

देशात सध्या जवळपास तेवीस कोटी रेशनकार्डधारक आहेत. त्यापैकी सात ते अठरा टक्के कार्डधारक हे रेशन न घेणारे, स्थलांतरित, मृत व्यक्तींच्या नावे असलेले किंवा बनावट कार्डधारक असू शकतात, असे प्रशासनाचे निरीक्षण आहे.

तसेच, केंद्र सरकारने आदेश दिला आहे की प्रत्येक कार्डधारकाची पाच वर्षांनी एकदा तरी पूर्ण छाननी केली जावी. त्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सक्तीची करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास कार्ड रद्द होऊ शकते.

संबंधित पोस्ट

यूएई आणि भारतामधील बँकिंग भागीदारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्कर्षाचे प्रतीक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांचा दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सहभाग

सुरक्षित शहरांसाठी सीसीटीव्हीचे प्रभावी सुरक्षा कवच निर्माण करण्यात यावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • सीसीटीव्ही यंत्रणेच्या सनियंत्रणासाठी महामंडळाची निर्मिती करा• माहिती व तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशःपारलिंगी व्यक्तिंना ओळखपत्रे देण्यासाठी दि.४ ते ८ ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिर

मराठा समाजाशी संबंधित निर्णयांमध्ये तातडीनं दुरुस्ती करावी, अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला धडा शिकवू, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील

विशेष वृत्त :सखी वन स्टॉप सेंटर म्हणजे पीडित महिलांच्या हक्काचा आधारवड

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात उलगडणार महाराष्ट्र घडविणाऱ्या संत, हुतात्मे आणि लोकनेत्यांचा इतिहास