vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचे साहित्य तरुणांमध्ये ऊर्जा निर्माण करते -अ‍ॅड.भास्कर मगरे

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचे साहित्य तरुणांमध्ये ऊर्जा निर्माण करते -अ‍ॅड.भास्कर मगरे

अंबड, द(प्रतिनिधी)- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य तरुणांमध्ये ऊर्जा निर्माण करते, असे प्रतिपादन शिवसेना दलितआघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे यांनी केले.अंबड तालुक्यातील जामखेड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अ‍ॅड. मगरे यांनी साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी समाज बांधवांशी संवाद साधतांनाअ‍ॅड. भास्करराव मगरे म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासाहित्यातून अंध श्रध्देवर असुड ओढत पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर नसूनकामगारांच्या हातावर उभी आहे, तर शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचारसाहित्यातून पोवाड्यातून आणि गाण्यातून पटवून देण्याचे काम केले. १५०कथा, ३६ कांदबर्‍या पोवाडे आणि गाणे असे साहित्य निर्माण केले आणिसामाजिक चळवळ आणि जातीयेताविरुध्द आवाज उठवला. श्रमिकांसाठी लढा दिला. १ऑगस्ट रोजी जन्माला आलेले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे १८ जुलै१९६९ रोजी त्यांचे निधन झाले, असेही अ‍ॅड. भास्कर मगरे यांनी सांगितले.यावेळी आण्णासाहेब बाळराज, जय खरात, भाऊसाहेब पांजगे, देवराव म्हस्के,संतोष पांजगे, पवार काका, गायकवाड यांच्यासह गावातील तरुण उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व वित्तमंत्री कनूभाई देसाई यांच्या उपस्थितीत डाईंग अँड पेगमेंट्स असोशिएशन अमृत महोत्सव साजरा करणार..

मॅग्नेट 2.0 प्रकल्पाद्वारे पणन विषयक गुंतवणूक, कृषिमालाचे मूल्यवर्धन व रोजगारवाढीस गती देणार – पणन मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हवा गुणवत्तेमध्ये सुधारणा व्हावी हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून-डीप क्लिनींगव्दारे हवा गुणवत्ता सुधारणेवर भर…

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज मागविले

मा. न्यायालयाच्या आदेशाचे सरकारने कठोर अंमलबजावणी केल्यास दलित आदीवासी भूमिहीन कास्तकराचे कास्तपट्टे नियमानूकुलित होतील – अ‍ॅड. भास्कर मगरे