vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाठा यांच्यात नाशिक बैठकीत वाद विवाद तुफान राडा, नेते बैठक सोडून गेले

ममहाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाठा यांच्यात नाशिक बैठकीत वाद विवाद तुफान राडा, नेते बैठक सोडून गेले…

राज्य प्रतिनिधी-राज्यात शिवसेना-मनसे युतीसंदर्भात चर्चा सुरु असून, नेमकं काय होणार यासंदर्भात वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. यादरम्यान नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधील वाद उफाळून आला आहे. मनसे शिवसेना युतीच्या बैठकीत गटबाजीचा वाद पुन्हा एकदा समोर आला. वाद इतका वाढला की ठाकरेंच्या नेत्याने बैठकीतून काढता पाय घेतला.

ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे आणि ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांच्यात हा वाद झाला. विधानसभा निवडणुकीत वसंत गीते उमेदवार असताना प्रचाराचा मुद्दा जयंत दिंडे यांनी उपस्थित केला. एमडी ड्रग्स विषय लोकांपर्यंत व्यवस्थित न पोहोचल्याने गीते यांचा प्रभाव झाला अस जयंत दिंडे म्हणाले.. मात्र यावर विनायक पांडे यांनी आक्षेप घेत तसं असतं तर गीते यांना एवढे मतदान झालं असते का? असा सवाल विचारला.

विनायक पांडे आणि जयंत दिंडे यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. आम्ही इतके वर्ष पक्षात आहोत ते उगाच का? असं म्हणत विनायक पांडे तडकाफडकी बैठक सोडून निघून गेले. विनायक पांडे यांच्या मागोमाग पांडे समर्थक देखील बैठक सोडून निघून गेले.

बैठकीनंतर जयंत दिंडे यांनी सांगितलं की, “आमच्यात काहीच वाद झाला नाही. आम्ही लहानपणापासूनचे मित्र आहोत. हा गैरसमज पसरवला जात आहे. पांडे का निघून गेले माहिती नाही. मी प्रत्येक भाषणात काही झालं असेल तर माफी मागतो. कृपया गैरसमज पसरवू नका”.

उपनेते दत्ता गायकवाड यांनी म्हटलं की, “हे शहर देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले होते. स्मार्ट सिटीच्या नावाखाली भकास झालं. गांजा ड्रग्ज, खून, हनी ट्रॅप बाबत शोध घेतला जात नाही. आम्ही याबाबत वाचा फोडणार, जिल्ह्यात संयुक्त बैठक घेणार आहे. शहरावर अन्याय होतो आहे, त्यावर आमचे दोनच पक्ष लक्ष घालतील. आम्ही राजकारण करत नाही, शिवसेनेचा जन्म राजकारणांसाठी नाही. सामान्य लोकं काय सांगतायत बघा, खड्डामुक्त शहरासाठी आंदोलन केले. निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन आंदोलन नाही. 100 पारचा नारा देऊन त्यांना उमेदवार मिळत नाही. काही वाद झाला नाही, गैरसमज निर्माण झाला असेल”.

“किरकोळ वाद झाला. ड्रग्जचाच मुद्दा आता आम्हाला घ्यायचा आहे, हनी ट्रॅपचा मुद्दा आहे. भाषणात काय बोलले माहिती नाही, काहीच गैरसमज नाही. आम्ही एकत्र का आलो ? शहराची काय अवस्था झाली आहे. मुंबईत एकत्र आलो तर हिंदीसक्तीचा निर्णय मागे घेतला. आम्ही शहरासाठी एकत्र आलो आहे निवडणूकीसाठी एकत्र आलो नाही,” असंही ते म्हणाले.

मनसे पदाधिकारी दिनकर पाटील यांनी सांगितलं की, ” मनसे आणि शिवसेना यांच्यात बैठक झाली. जनतेवर अन्याय होतो त्यावर आमची चर्चा झाली. यापुढे आम्ही मोर्चा काढणार. कायदा सुव्यवस्थेबाबत आम्ही मोर्चा काढणार. विभाग आणि तालुक्यानुसार आम्ही एकत्रित बैठक घेणार. – एकत्रित मोर्चा काढणार आणि सरकारला जाब विचारणार. आमचे वरिष्ठ नेते यामध्ये सहभागी होतील. 15 दिवसानंतर मोर्चा काढून, आमचं सगळं काही एकत्र राहणार असल्याचे सूत्रांकडून कळते

00000

संबंधित पोस्ट

पैठणमध्ये महिला बचत गटांच्या उत्पादनांचा जिल्हास्तरीय भव्य विक्री महोत्सव-महीला बचत गटांना एक कोटी कर्जाचे वितरण

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव जम्मू-काश्मीरमध्ये : पर्यटकांशी साधला संवाद • पर्यटकांना सुखरूप घरी पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वे- पर्यटकांच्या चेहऱ्यावर फुलल हास्य..

आज दि.18 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन भवन येथे “स्वामित्व”योजनेंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रमाचे आयोजन…

vishwatmaklokswamivarta

स्वस्ती निवास’ कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला सर्वतोपरी सहकार्य करू- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ‘एनसीआय’ला देशातील प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट करणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वस्ती निवास इमारतीचे भूमिपूजन

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

राज्यातील विद्यार्थ्यांना गणवेश वितरणात झालेल्या विलंबाची चौकशी- शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर