vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील सीता मातेचे जन्मस्थान असलेल्या पुनौराधाम मंदिर आणि परिसराच्या समग्र विकासासाठी केले भूमिपूजन,विरोधी पक्षांना घुसखोरांची मते हवी आहेत मात्र बिहारचे लोक याचा स्वीकार करणार नाहीत

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील सीता मातेचे जन्मस्थान असलेल्या पुनौराधाम मंदिर आणि परिसराच्या समग्र विकासासाठी केले भूमिपूजन,विरोधी पक्षांना घुसखोरांची मते हवी आहेत मात्र बिहारचे लोक याचा स्वीकार करणार नाहीत

 नवी दिल्ली प्रतिनिधी

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील माता सीतेचे जन्मस्थान असलेल्या पुनौराधाम मंदिर आणि परिसराच्या समग्र विकासासाठी भूमिपूजन केले. अमित शाह यांनी सीतामढी ते दिल्ली या अमृत भारत ट्रेनला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला.

भाषणात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सांगितले की, आज माता जानकी यांचे जन्मस्थान असलेल्या पुनौरा धाम मंदिर परिसराच्या विकासासाठी भूमिपूजन करणे हा केवळ सीतामढी, मिथिला आणि बिहारसाठीच नव्हे तर संपूर्ण देश आणि जगासाठी एक अतिशय शुभ प्रसंग आहे.अमित शाह म्हणाले की, पुनौराधाममध्ये सुमारे 890 कोटी रुपये खर्चून 68 एकरपेक्षा जास्त जागेवर शक्तीस्वरूपा जगतजननी माता जानकी यांचे भव्य मंदिर बांधले जाईल. ते म्हणाले की, माता सीतेचे जीवन चरित्र आणि रामायणातील कथा इथल्या परिक्रमा पथ, ध्यान केंद्र वाटिका, धार्मिक जलस्रोतांची पुनर्बांधणी, धर्मशाळा, कॅन्टीन, वैद्यकीय सुविधा आणि डिजिटल गॅलरीमध्ये सांगितल्या जातील. ते म्हणाले की, 3D अनुभवाद्वारे आपल्या तरुण पिढ्यांना श्री रामांसह माता जानकीच्या जीवनातील सर्व प्रेरणादायी घटना पाहता येतील.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, आज सीतामढी-दिल्ली अमृत भारत ट्रेन देखील सुरू करण्यात आली आहे.

अमित शहा म्हणाले की, माता सीतेच्या श्रीरामांशी झालेल्या पहिल्या भेटीपासून ते लव-कुश यांचे जन्मस्थान , माता सीता यांचे अंतिम निवासस्थान आणि पंथ पाकर पर्यंत सर्व स्थानांचे पुनरुज्जीवन करून माता सीतेची जीवनगाथा देशाच्या महिला शक्तीला समर्पित केली जाईल.केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, बिहार निवडणुकीपूर्वी सर्व वर्तमानपत्रांमध्ये विशेष पुनरीक्षण प्रक्रिया (SIR) करावी की नाही याविषयी बातम्या प्रसिद्ध होत आहेत. घुसखोरांचे नाव मतदार यादीतून काढून टाकू नये का आणि निवडणूक आयोगाने ‘SIR’ करावे की नाही अशी विचारणा त्यांनी जनतेला केली. शाह म्हणाले की, बांगलादेशातून भारतात घुसलेल्या आणि आपल्या तरुणांच्या नोकऱ्या हिरावून घेणाऱ्यांना वाचवण्याची विरोधी पक्षाची इच्छा आहे. ते म्हणाले की, विरोधी पक्षांना घुसखोरांची मते हवी आहेत मात्र बिहारचे लोक ते स्वीकारणार नाहीत. शाह म्हणाले की, विरोधी पक्षानी मतपेढीचे राजकारण थांबवावे.भारतात जन्म झालेला नाही त्यांना आपले संविधान मतदानाचा अधिकार देत नाही असे गृहमंत्री म्हणाले .

 

संबंधित पोस्ट

राजकारणापेक्षा माझ्यासाठी समाजकारण महत्त्वाचे-दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे

vishwatmaklokswamivarta

हज गट आयोजक HGOs/PTOs मार्फत हज 2026 साठी नोंदणी करणाऱ्या यात्रेकरूंसाठी मार्गदर्शक सूचना उरलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत 25 जानेवारी 2026 पर्यंत

vishwatmaklokswamivarta

आणीबाणीत कारावास भोगलेल्यांनी मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नवी मुंबई महानगरपालिकेस लोकाभिमुख डिजीटल सेवेचा ‘स्मार्ट गव्हर्नन्स पुरस्कार’

vishwatmaklokswamivarta

जय शिवाजी, जय भवानी”च्या जयघोषाने दुमदुमले गडचिरोली!*जय छत्रपती शिवाजी – जय भारत पदयात्रा उत्साहात संपन्न”शिवरायांचे विचार अंगीकारून व्यक्तिमत्त्व घडवा” – जिल्हाधिकारी एकता पार्क चे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता बी.ई./बी.टेक आणि एमबीए/एमएमएस यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तीन दिवस मुदतवाढ