vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करावा- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करावा- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना प्रतिनिधी- आजमितीस तंत्रज्ञानात नवनवीन बदल होत असून सद्यस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्वत्र केला जात आहे. तरी जालना जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी -कर्मचाऱ्यांनी शासकीय कामकाज करतेवेळी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए.आय.) वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी प्रशिक्षणात केले.

जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवार दि. 28 ऑगस्ट 2025 रोजी एम. के. सी. एल. मार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी, तहसीलदार अनिल नव्हाते, तहसीलदार प्रणाली तायडे यांची उपस्थिती होती. यावेळी एमकेसीएलचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक विनायक कदम यांनी ए. आय. आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सविस्तर प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणास महसूल अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित पोस्ट

लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपोलीस दलाला बळकटी देणाऱ्या देखण्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..

श्रीगणेशोत्सवाच्या राज्य महोत्सवांतर्गत नवी मुंबईत 3 सप्टेंबरला भव्यतम ‘कलागणेश महोत्सव’

vishwatmaklokswamivarta

रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद व अतिजलद गाड्यांना थांबा-महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी इंदोर एक्स्प्रेसला दाखवला हिरवा झेंडा

vishwatmaklokswamivarta

आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा-सर्व विभागांच्या समन्वयातून ‘आषाढी वारी’ यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश..

महाज्योती संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात येणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

बुलढाणा जिल्हा गुंतवणूक परिषद मंगळवारी- गुंतवणूकदार, उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन- सामंजस्य करार करण्याची संधी