vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जालना गणेश फेस्टिवल तर्फे त्रैभाषिक मुशायरा-कवी संमेलन

जालना गणेश फेस्टिवल तर्फे त्रैभाषिक मुशायरा-कवी संमेलन

जालना (प्रतिनिधी) : जालना गणेश फेस्टिवल २०२५ या सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने शनिवार दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजता श्री कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल, जुना जालना येथे भव्य त्रैभाषिक मुशायरा व कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक मा. रामराव रिंढे भूषविणार असून हिंदी, उर्दू व मराठी अशा तिन्ही भाषांतील नामवंत कवी या संमेलनात सहभागी होणार आहेत.हिंदी कवी : मा. कमल किशोर शर्मा, डॉ. सलीम नवाज हशर, अब्दुल रज्जाक रहबर, शिवकुमार बैजलउर्दू कवी : आरिफ भाई, डॉ. रिहान दानिश, अब्दुल हसीब फतहान, हाफिज अनिस, नाजीम खान (सेवली), अब्दुल रहीम, जोहर हुसेन ताहेर, परवेज आलम, नईम खान नईम

मराठी कवी : रेखा बैजल, डॉ. संजीवनी तडेगावकर, सुनील लोणकर, गोविंदप्रसाद मुंदडा, कविता बोरगावकर, राजाराम जाधव, भीमराव सपकाळ, किशोर ज-हाड, प्रदीप इक्कर, कल्याणी देशमुख, रमाकांत कुलकर्णी, विठ्ठल काष्टे, सुरेश कायटे, शंकर कपाळे, प्रकाश कुंडलकर, पंडित वराडे, श्रीकांत गायकवाड, विनायक काळे, माधवी चव्हाण, गोवर्धन मुळक, वसंत कोलते, उत्तमराव शेजवळ, विद्या दिवटे, जगन्नाथ काकडे, सत्यशिला तौर, कैलास भाले, शिवाजी कायंदे, डॉ. प्रभाकर शेळके, डॉ. सुहास सदाव्रते, डॉ. शशिकांत पाटील, राम गायकवाड, प्रा. अशोक खेडकर, मनीष पाटील, रत्नमाला मोहिते, रेखा गतखणे, शिवाजी तेलंगे, डॉ. दिगंबर दाते, विनोद जैतमहाल, सुहास पोतदार, डॉ. एकनाथ शिंदे, साहिल पाटील, दिनेश शेळके, विनोद काळे, छाया वाघ, गणेश खरात, डॉ. राज रणधीर, मनीषा गायकवाड, लक्ष्मीकांत दाभाडकर, प्रा. शोभना भालेराव, जिजा वाघ, कृष्णा कदम, आबासाहेब म्हस्के, किशोर भालेराव, वैशाली फुके, समाधान खाडे आदी अनेक कवी आपली कविता सादर करणार आहेत.

या मुशायरा-कवी संमेलनाचे सुत्रसंचालन प्रा. पंढरीनाथ सारके करतील. या अनोख्या साहित्यिक मेजवानीत जालना व परिसरातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय लाखेपाटील, अध्यक्ष २०२५ अशोकराव आगलावे, कार्याध्यक्ष भाऊसाहेब घुगे, सतीश पंच व संयोजन समिती यांनी केले आहे

संबंधित पोस्ट

राज्य शासनाची भूमिका -. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून, १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भात बैठक

लातुरात महा विधी सेवा शिबीर, शासकीय योजनांच्या महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद,कायदेविषयक मदतीसोबतच शासनाच्या योजना वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी न्याय संस्था प्रयत्नशील-न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर• विविध शासकीय योजनांचे वितरण; जनजजागृती चित्ररथाला हिरवी झेंडी• विविध योजनांविषयी भव्य प्रदर्शनी; लातूरकरांनी नोंदविला सहभाग

विनापरवाना जैव उत्प्रेरक विक्री व साठवणूक; कृषी विभागाची कारवाई92 लक्ष रू. चा मुद्देमाल जप्त

लातूर येथे 25 मार्च रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा*

वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदूरबार जिल्ह्यातल्या देवगुई घाट परिसरात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर ५३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरु केलं. जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

vishwatmaklokswamivarta