vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वसतिगृह प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन; ऑनलाईन अर्ज 18 सप्टेंबरपर्यंत मागविले

वसतिगृह प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन; ऑनलाईन अर्ज 18 सप्टेंबरपर्यंत मागविले

बुलढाणा,I प्रतिनिधी: शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये शासकीय वसतीगृहापासून वंचित असलेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी 18 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक मनोज मेरत यांनी केले आहे.

अर्जाची प्रक्रिया व निवड याद्या http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असून शासन निर्णयातील अटी व शर्ती लागू राहणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण जिल्हा कार्यालय, बुलढाणा येथे सादर करावा.

पात्रता : इयत्ता १२ वी नंतर उच्च शिक्षणासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेले विद्यार्थी, शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याचे प्रमाणपत्र, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व धनगर समाजातील विद्यार्थी पात्र, किमान 60 टक्के (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के गुण), पालकांचे वार्षिक उत्पन्न 2 लक्ष 50 हजारांपेक्षा जास्त नसावे, कमाल वय 30 वर्षांपर्यंतच पात्र, विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा तसेच कोणत्याही नोकरी/व्यवसायात नसावा.

00000

संबंधित पोस्ट

संत ज्ञानेश्वर उद्यान दि.२६ पर्यंत पर्यटकांसाठी खुले करण्याचे नियोजन करावे- खा.संदिपान भुमरे

डोंगरांवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण तयार करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कामांचा आढावा

सावरगाव सिंचन योजनेतील अडचणी तातडीने दूर करून कामांना गती द्यावी : मंत्री छगन भुजबळ

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यात सेवा पंधरवडा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ संपन्न ग्रामस्थांच्या सहभागाने सेवा पंधरवडा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वीपणे राबवावे-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे    –विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी

आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात तर मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.

vishwatmaklokswamivarta