vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अन्न व औषध प्रशासनाकडून गणेश मंडळे व नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

अन्न व औषध प्रशासनाकडून गणेश मंडळे व नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

बुलडाणा, प्रतिनिधी: आगामी गणेशोत्सव काळात मंडळे व नागरिकांनी प्रसाद, भंडारा व अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी अन्न व औषध प्रशासनाने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. गणेश मंडळांनी Fssai.gov.in या संकेतस्थळावरील फोसकॉस (Foscos) पोर्टलवर नोंदणी करून प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

मार्गदर्शक सूचना याप्रमाणे : प्रसाद व अन्नपदार्थ स्वच्छ पाण्याने, स्वच्छ भांड्यांत आणि स्वच्छ हाताने तयार करावेत, शिळे होणारे पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवून साठवू नयेत, प्रसाद स्वच्छ व कोरड्या स्वरूपात तयार करावा.

कच्चा माल व घटकद्रव्ये : तुप, तेल, दूध, खोबरे, पीठ इत्यादी पदार्थ नेहमी ताजे व प्रमाणित दर्जाचे असावेत, कच्चा माल केवळ FSSAI परवाना असलेल्या दुकानदारांकडूनच खरेदी करावा, खरेदीची बिले मागवून जतन करावीत, पॅकबंद वस्तूंवर FSSAI क्रमांक, उत्पादन तारीख व कालबाह्यता तारीख तपासावी, एकाच तेलात वारंवार तळणे टाळावे, भंडारा अथवा प्रसादासाठी ताजी फळे व भाज्या वापराव्यात.

स्वयंपाक व वितरण पद्धत : प्रसाद शक्यतो गरमागरम वाटावा, थंड पदार्थांसाठी शीतसाखळीचे पालन करावे, दूधापासून बनलेले पदार्थ 12 तासांतच वापरावेत, स्वच्छ व झाकलेल्या भांड्यांतून प्रसाद वाटावा, प्रसाद वाटताना हात स्वच्छ धुवावेत, शक्यतो हातमोजे व झाकलेली पात्रे वापरावीत, प्लास्टिकऐवजी पर्यावरणपूरक भांडी/पाने वापरावीत, केटरिंग सेवेकडून प्रसाद घेतल्यास त्यांचा FSSAI परवाना तपासावा.

आरोग्याची काळजी : ताप, खोकला वा संसर्गजन्य आजार असलेल्या व्यक्तींनी अन्न तयार करणे व वाटप करणे टाळावे, प्रसादात कृत्रिम रंग, सुगंधी द्रव्ये वा घातक रसायनांचा वापर करू नये.

साठवणूक व वाहतूक : लवकर खराब होणारे पदार्थ थंड जागी वा शीतगृहात ठेवावेत, अन्न नेहमी झाकून ठेवावे, उरलेला प्रसाद फेकून न देता त्याचे योग्य व्यवस्थापन करावे.

000000

संबंधित पोस्ट

जमीन महसूल वसुलीसह फेरफार प्रकरणांचा तातडीने निपटारा करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया-विविध विकासकामांची केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

आयसीसी महिला विश्वचषक २०२५ या स्पर्धेत विश्वविजेता ठरलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्कार केला. भारताला प्रथमच #विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. 

vishwatmaklokswamivarta

विश्वास नांगरे पाटील यांनी छावा चित्रपटावर ही प्रतिक्रिया दिली आहे जी सोशल मीडियावर व्हायरल

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तानी समाज माध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवण्याची एक सुनियोजित मोहीम राबविली जात आहे. जाणीवपूर्वक पसरवलेल्या चुकीच्या माहितीला बळी पडू नका.

जिल्हा माहिती कार्यालयाच्या चित्ररथाचे उद्घाटन व हिरवी झेंडी दाखवून रवाना

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘माविम’ने कार्याची व्याप्ती वाढवावी- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे