
श्रीसूक्त स्तोत्राचे महत्व🌹 *सुख – समृद्धी व वैभव प्राप्तीसाठी श्रीसूक्त💥 *हे स्तोत्र पठण करण्याचे फायदे
आध्यात्मिक वार्ता
श्रीसूक्त हे एक वैदिक सूक्त आहे. वेदमंत्र हे सिद्ध मंत्र आहेत. त्यांच्या ठायी जीवन साधनेची उत्तुंग शक्ती आहे. यासाठी प्रामाणिक इच्छा आणि दुर्दम्य प्रयत्न इतकं पुरेसं आहे. हे सूक्त पंधरा ऋचांचे असून ते ऋग्वेदाच्या पाचव्या मंडलाच्या अंती परिशिष्ट म्हणून दिलेले आहे. याला खिलसूक्त असे म्हणतात. यास्क व शौनक या आचार्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. या सुक्तावर विद्यारण्य, पृथ्वीधर, श्रीकण्ठ या पंडितांनी भाष्ये, टीका, वृत्ती लिहिल्या आहेत. यावरून श्रीसुक्ताची लोकप्रियता आणि विद्वानमान्यता कळून येते. एक प्रासादिक सूक्त म्हणून प्राचीन काळापासून त्याचा गौरव होत आला आहे. अनेक भाविकांनी श्रीसूक्ताचा जप, पुरश्चरण करून आपले मनोवांछित पूर्ण करून घेतलेले आहे. इतर देवतांची उपासना करून आपण त्यांच्याकडे धन , धान्य,भाग्य मागून घेतो पण या सूक्तात खुद्द लक्ष्मी आईकडेच सर्व कामनांची मागणी करतो.



