vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

शरद पवार असो वा फडणवीस, कोणीही ओबीसीमध्ये नवीन जात टाकू शकत नाहीत, अन्याय झाला तर लाखोंच्या संख्येने मुंबईत येणार; छगन भुजबळांचा इशारा

शरद पवार असो वा फडणवीस, कोणीही ओबीसीमध्ये नवीन जात टाकू शकत नाहीत, अन्याय झाला तर लाखोंच्या संख्येने मुंबईत येणार; छगन भुजबळांचा इशारा

राज्य प्रतिनिधी-मराठा आणि कुणबी एक आहे हा मूर्खपणा असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मराठा समाज हा मागास नाही असे निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देता येणार नाही. मराठा कुणबी एक होऊ शकत नाही असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ  यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.

 

 मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटलो आहे. गॅजेट्स सगळे दफ्तर आहे. कोटा ओलांडला तर आम्ही दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर राहणार असल्याचे भुजबळ म्हणाले. केंद्र सरकारने एक कायदा बनविला आहे. जे ओबीसी किंवा दलित, आदिवासीमध्ये बसत नाहीत पण आर्थिक मागास आहे. पण सामाजिक दृष्ट्या EWS आरक्षण लागू झाले आहे.

त्यात 10 टक्के आहे, इतर 8 टक्के उमेदवार मराठा समाजाचे आहेत हे सरकारने जाहीर केल्याचे भुजबळ म्हणाले. ब्राम्हण सुद्धा शेतकरीआहेत. मारवाडी देखील शेतकरी आहेत, मग ते कुणबी आहेत का असे भुजबळ म्हणाले. 27 टक्क्यामधील 17 टक्के शिल्लक आहे. या 17 टक्क्यांमध्ये 374 जाती आहेत. तुम्ही आमच्यामध्ये आणखी कोणी टाकू नका

50 टक्के आरक्षण हे सामाजिकदृष्ट्या मागास असणाऱ्यांसाठी आहे. पण मराठा समाज हा सामाजिक मागास ठरत नाही असे भुजबळ म्हणाले. आमच्या ओबीसीच्या आरक्षणात दुसरे वाटेकरी नको असेही भुजबळ म्हणाले. शरद पवार असो की देवेंद्र फडणवीस कोणीही ओबीसीमध्ये एससीमध्ये एसटीमध्ये नवीन जात टाकू शकत नाही असे भुजबळ म्हणाले. आमच्यावर अन्याय झाला तर लाखोंच्या संख्येने मुंबईत येणार असल्याचे भुजबळ म्हणाले

संबंधित पोस्ट

बिहारच्या मतदार यादीत 18 लाख मृत, 26 लाख स्थलांतरित व 7 लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार..

गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो; हा आदर्श येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गव्हाण, इंदरठाणा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; आ. रमेशआप्पा कराड यांच्याकडून नुकसानीची पाहणी

बाल कल्याण समिती अध्यक्ष / सदस्य या पदाकरिता पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत*

वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरासाठी समिती स्थापन करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक

पर्यावरण संवर्धनासाठी कमी कार्बन उत्सर्जनवर भर द्यावा.- माहिती तंत्रज्ञान मंत्री, ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta