vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसाय

केंद्र सरकारने सादर केलेल्या जीएसटी दर कपात आणि सुधारणांच्या प्रस्तावांना एकमताने संमती दिल्याबद्दल पंतप्रधानांनी जीएसटी परिषदेची केली प्रशंसा, सर्वसामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि युवकांना याचा लाभ होईल

केंद्र सरकारने सादर केलेल्या जीएसटी दर कपात आणि सुधारणांच्या प्रस्तावांना एकमताने संमती दिल्याबद्दल पंतप्रधानांनी जीएसटी परिषदेची केली प्रशंसा, सर्वसामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि युवकांना याचा लाभ होईल

नवी दिल्ली प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र आणि राज्यांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने जीएसटी दर कपात आणि सुधारणांबाबत केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रस्तावांना एकमताने संमती दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र आणि राज्यांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने जीएसटी दर कपात आणि सुधारणांबाबत केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रस्तावांना एकमताने संमती दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. याचा लाभ सामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि युवकांना होईल. “व्यापक सुधारणांमुळे आपल्या नागरिकांचे जीवनमान सुधारेल आणि सर्वांसाठी, विशेषतः छोटे व्यापारी आणि व्यवसायांसाठी व्यवसाय सुलभता सुनिश्चित होईल”, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

“स्वातंत्र्यदिनाच्या माझ्या भाषणात, मी जीएसटीमध्ये नवीन पिढीतील सुधारणा आणण्याचा आमचा मानस व्यक्त केला होता. केंद्र सरकारने व्यापक-आधारावर जीएसटी दरांचे सुसूत्रीकरण आणि प्रक्रिया सुधारणांसाठी एक सविस्तर प्रस्ताव तयार केला होता, ज्याचा उद्देश सामान्य माणसाचे जीवनमान सुलभ करणे आणि अर्थव्यवस्था मजबूत करणे हा होता.

केंद्र आणि राज्यांचा समावेश असलेल्या @GST_Council ने जीएसटी दर कपात आणि सुधारणांबाबत केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रस्तावांना एकमताने संमती दर्शवली आहे हे नमूद करताना आनंद होत आहे, ज्याचा लाभ सामान्य माणूस, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि युवकांना होईल.

या व्यापक सुधारणांमुळे आपल्या नागरिकांचे जीवनमान सुधारेल आणि सर्वांसाठी, विशेषतः छोटे व्यापारी आणि व्यवसायांसाठी व्यवसाय सुलभता सुनिश्चित होईल.”

000000

संबंधित पोस्ट

आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल (AA+ STABLE)’ या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महानगरपालिका सलग अकराव्यांदा मानकरी..

शुक्रवारी माहूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्ह व रोजगार मेळावा 

मुंबई उपनगर ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते १२ फेब्रुवारीला उद्घाटन १२ व १३ फेब्रुवारीला ग्रंथदिडी, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ विक्री, चर्चासत्र व मार्गदर्शन भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात ‘ग्रामपंचायत तेथे सहकारी संस्था’अभियान राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मार्चअखेर प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात संस्था कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट

vishwatmaklokswamivarta

अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सुशासन दिन समारंभात उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित; प्रशासन सज्ज,चोख बंदोबस्त,अफवांवर विश्वास ठेवू नका-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन