
नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई आणि राष्ट्रीय विज्ञान संप्रेषण केंद्र यांच्या वतीने डॉ. सरोज घोष आणि डॉ. व्ही. एस. वेंकटवर्धन स्मृति व्याख्यानांचे आयोजन
राज्य प्रतिनिधी –
डॉ. सरोज घोष यांच्या जयंतीनिमित्त सोमवार 1 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी नेहरू विज्ञान केंद्र (एनएससी), मुंबई यांनी राष्ट्रीय विज्ञान संप्रेषण केंद्र (एनसीएससी) यांच्या सहकार्याने डॉ. सरोज घोष आणि डॉ. व्ही. एस. वेंकटवर्धन स्मृती व्याख्यानांचे संयुक्त पद्धतीने (ऑनलाइन आणि ऑफलाइन) आयोजन केले.
कार्यक्रमाची सुरुवात नेहरू विज्ञान केंद्र, मुंबईचे संचालक उमेश कुमार यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी डॉ. घोष आणि डॉ. वेंकटवर्धन यांच्या भारतातील विज्ञान लोकप्रियता आणि संग्रहालय विकासातील अग्रणी भूमिकेचे स्मरण केले. कार्यक्रमादरम्यान दिलेल्या व्याख्यानांचा त्यांनी विचारपूर्वक सारांश देखील दिला.भारतातील विज्ञान केंद्र चळवळी – बदलाचे आदर्श” या शीर्षकाचे डॉ. सरोज घोष स्मृती व्याख्यान उत्तराखंड सरकारचे डीएसटी सल्लागार आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या एनसीएसएमचे माजी महासंचालक जी. एस. रौतेला यांनी केले
आपल्या व्याख्यानात रौतेला यांनी भारतातील विज्ञान केंद्र चळवळीचा व्यापक आढावा सादर केला, ज्यामध्ये त्याच्या स्थापनेपासून ते सार्वजनिक सहभागाचे एक महत्त्वाचे माध्यम म्हणून विज्ञानाच्या सध्याच्या भूमिकेपर्यंतच्या उत्क्रांतीचा आढावा घेतला. त्यांनी प्रमुख प्रतिमान बदलांवर प्रकाश टाकला, यात खालील मुद्यांचा समावेश होता:निष्क्रीय निरीक्षणापासून सहभागी, परस्परसंवादी शिक्षणाकडे होणारे संक्रमण.फिरत्या विज्ञान प्रदर्शनांची स्थापना (1965), विज्ञान उद्याने (1979), आणि नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई (1978; 1985 पासून कार्यरत).विज्ञान संवादाची उत्क्रांती – ज्ञान हस्तांतरणापासून ज्ञान निर्मितीपर्यंत आणि वैयक्तिक शिक्षणापासून सामुदायिक सहभागापर्यंत.
तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण, शाश्वततेवर भर, समावेशकता, सामाजिक जबाबदारी आणि जागतिक वैज्ञानिक आव्हाने.भूतकाळात प्रवेश करणे, वर्तमानाशी जोडणे, भविष्याला आकार देणे” या शीर्षकाचे डॉ. व्ही. एस. वेंकटवर्धन स्मृती व्याख्यान व्हिजन-आयपीआरचे सीईओ प्रो. प्रबुद्ध गांगुली यांनी दिले.
प्रा. गांगुली यांनी ऐतिहासिक ज्ञान प्रणाली आणि मानवी कल्पकता वर्तमान कृतींना कसे मार्गदर्शन करू शकतात आणि शाश्वत, नवोन्मेष-चालित भविष्य घडवण्यास कशी मदत करू शकतात यावर भर दिला. या व्याख्यानात त्यांनी जागतिक सहकार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगततेचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रीय विज्ञान संप्रेषण केंद्र, मुंबईचे संयोजक सुहास बी. नाईक-साटम यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. या स्मृती व्याख्यानांमध्ये शास्त्रज्ञ, शिक्षक, विद्यार्थी आणि विज्ञान संप्रेषण समुदायाच्या सदस्यांसह 150 हून अधिक उपस्थितांचा उत्साही सहभाग दिसून आला.



