vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

नेपाळमध्ये हिसक आंदोलन- नेपाळच्या प्रधानमंत्री के पी शर्मा ओली चा राजीनामा, हिंसक आंदोलनानंतर पायउतार; देश सोडला..

नेपाळमध्ये हिसक आंदोलन- नेपाळच्या प्रधानमंत्री के पी शर्मा ओली चा राजीनामा, हिंसक आंदोलनानंतर पायउतार; देश सोडला..

विदेश प्रतिनिधी- भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर सुरू झाले  हिंसक आंदोलन: सोशल मीडियावरील बॅनविरोधात नेपाळमधील तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. या आंदोलनामुळे देशात सत्तांतर होण्याची चिन्हं आहेत. शेजारील देशात सुरु असलेल्या आंदोलनानं ओली सरकार संकटात सापडलं आहे. पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनीदेखील नुकताच राजीनामा दिला आहे. सरकारनं कालच सोशल मीडियावरील बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतरही तरुणाईचा रोष कमी झालेला नाही. आंदोलनाची धग देशभरात जाणवू लागली आहे.

नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी देश सोडून दुबईला पळून गेल्याचे सूत्रांची माहिती  . सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय उपचारांच्या बहाण्यानं ते दुबईला जाऊ शकतात. अशी चर्चा होती परंतु नेपाळमधील खासगी विमान कंपनी असलेल्या हिमालय एअरलाइन्सचं विमान स्टँडबायवर ठेवण्यात आलं आहे. पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी  देश सोडला असल्याचे सांगण्यात येत आहे . सध्याच्या घडीला जेन झीचं आंदोलन निर्णायक टप्प्यावर आहे. या आंदोलनानं देशात क्रांती घडू शकते. नवीन चेहरा पंतप्रधानाचा समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

यावेळी मोठ्या प्रमाणात नेपाळमध्ये सुरु असलेलं तरुणाईचं आंदोलन अधिकाधिक तीव्र होत चाललं आहे. तरुणांनी संसदेत घुसून दोन्ही सदनांना आग लावली. सध्याच्या घडीला संपूर्ण संसद आंदोलकांच्या ताब्यात आहे. दुसरीकडे संपूर्ण देशात राजीनामांचा सिलसिला सुरु झाला आहे. आंदोलकांचा धसका घेत मधेश प्रदेशचे मुख्यमंत्री सतीश सिंह यांनी राजीनामा दिला आहे. यासोबतच लुंबिनी, गंडकी, सुदूर पश्चिम प्रदेशसह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्‍यांनी राजीनामे दिले आहेत. राजधानी काठमांडूसह अनेक राज्यांमध्ये आंदोलनं सुरु आहेत. जाळपोळ, दगडफेक यांच्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे. हिंसाचाराच्या घटना वाढत असल्यानं राजकीय संकट निर्माण झाल्याचं स्पष्ट दिसत आहे

संबंधित पोस्ट

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये लष्करी कारवाई

संरक्षण मंत्र्यांची अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांसोबत दूरध्वनीवरुन चर्चा, वाढत्या औद्योगिक सहकार्यावर भर देत संरक्षण संबंध वाढविण्याबाबत चर्चा

संयुक्त अरब अमिरात दुबई, शारजाह आणि अजमान यांसारख्या शहरामध्ये मुसळधार पाऊस जनजीवन विस्कळीत..

vishwatmaklokswamivarta

बांगलादेशात 1,400 लोक मारले गेले, मोहम्मद युनूस सरकारमध्ये हिंदूंना लक्ष्य करण्यात आले, संयुक्त राष्ट्राचा अहवाल भयावह .

vishwatmaklokswamivarta

ईरानमध्ये तणाव वाढल्याने भारताची ॲडव्हायझरी जारी; भारतीय नागरिकांना तातडीने देश सोडण्याचे आदेश हेल्पलाईन क्रमांक जारी

vishwatmaklokswamivarta

सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनच्या अध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट..