vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा यशस्वीतेसाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे!- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

‌कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा यशस्वीतेसाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे!- पालकमंत्री शंभूराज देसाई*

सातारा प्रतिनिधी : कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे मरळी येथे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ होण्यासाठी व यशस्वीतेसाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

पालकमंत्री कार्यालयात कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या नियोजनाची बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मागील वर्षी झालेल्या डोंगरी महोत्सवापेक्षा या वर्षीच्या डोंगरी महोत्सवाचे स्वरुप मोठे असले पाहिजे, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले या वर्षीचा डोंगरी महोत्सव पाच दिवसांचा असणार आहे. यामध्ये बोट, घोडेसवारी, फनफेर, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम घेण्यात यावेत. डोंगरी महोत्सवात कृषी विभागाने शेतकऱ्यांना नव तंत्रज्ञानाची माहिती मिळेल यासाठी विविध स्टॉल उभारावेत.

डोंगरी महोत्सवात ड्रोन, लेझर शो बरोबर हेलीकॉप्टर सफारीचेही आयोजन करावे. मागील डोंगरी महोत्सवात नागरिकांना ज्या गोष्टी आवडल्यात त्या जास्तीच्या उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, असेही त्यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

शहरात राहणाऱ्या अनुसूचित जाती, नवबौद्धांना  घरकुलासाठी मिळणार ₹२.५० लाख- जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटीलØ सर्व नगरपरिषद क्षेत्रात रमाई आवास योजना सूरुØ गरजुंनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आव्हान

महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत 25 जूनला लोकअदालतीचे आयोजन- अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांसाठीसी.एस.सी. केंद्रातून मिळणार माफक दरात सेवा- व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख

vishwatmaklokswamivarta

मुंबई व पुणे विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याबाबत बैठक

vishwatmaklokswamivarta

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत पाणी मागणी अर्ज करावे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे १२ वर्षे मुदतीचे२,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..