27 ते 30 सप्टेंबर कालावधीत पाठ्यपुस्तक मंडळांची सर्व व्यवहार बंद
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : शनिवार दि.27 सप्टेंबर, ते मंगळवार दि.30 सप्टेंबर, 2025 या कालावधीत पुस्तके व कागदाची भांडार स्तरावर वार्षिक प्रत्यक्ष साठा मोजणी होणार असल्याने या कालावधीत मंडळाची विभागीय भांडारे गोरेगाव, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक, कोल्हापूर, पनवेल व अमरावती येथील सर्व व्यवहार (आवक-जावक, विक्री इत्यादी) बंद राहतील. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाकडे नोंदणीकृत झालेल्या सर्व मुद्रक, बांधणीकार व पुस्तक विक्रेते तसेच शैक्षणिक संस्था आदी सर्व संबधितांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्राचे भांडार व्यवस्थापक एस.एम.पवार यांनी केली आहे.