vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथे अडकलेल्या चार मजुरांची सुखरूप सुटका

अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथे अडकलेल्या चार मजुरांची सुखरूप सुटका

लातूर, प्रतिनिधी : अतिवृष्टीमुळे अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथे अडकलेल्या चार मजुरांची आज दुपारी १२:५० वाजता प्रशासनाने सुखरूप सुटका केली. या कार्यात राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी वैयक्तिक लक्ष घालून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

घटनेची माहिती मिळताच सहकार मंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याशी संपर्क साधून बचाव पथकाला तातडीने घटनास्थळी रवाना केले. स्वतः पावसात चिलखा येथे पोहोचून मा. पाटील यांनी मजूर सुखरूप बाहेर येईपर्यंत घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवले.

आज पहाटे ५ वाजेपासून अडकलेल्या मजुरांना प्रशासनाने यशस्वीपणे बाहेर काढले. या कार्यात उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर, पोलीस निरीक्षक भुसनर यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रात अमृततर्फे दीपावलीमध्ये होणार विश्वविक्रमी दुर्गोत्सव छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना…

vishwatmaklokswamivarta

🌧️ रायगड जिल्हा तालुकानिहाय पर्जन्यमान🗓️ दिनांक: 01.07.2025 (आज 8 वाजेपर्यंत)

यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे   –जिल्हाधिकारी किशन जावळे

कल्पना बोर्डे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या दालनाने राष्ट्रीय राजधानीत राज्याचा ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक उद्योगशक्ती अधोरेखित – निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात सेवा पंधरवडा प्रभावीपणे राबविणार- जिल्हाधिकारी आशिष येरेकर..

vishwatmaklokswamivarta