vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

भारतीय संविधानाने प्रत्येकाला स्वाभिमान शिकवीला -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

भारतीय संविधानाने प्रत्येकाला स्वाभिमान शिकवीला -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

मुंबई / दुबई प्रतिनिधी भारतीय संविधानाने प्रत्येकाला स्वाभिमान शिकवीला आहे.भारताचे संविधान साकार करण्यात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे एकमेव योगदान आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या चळवळीचे मुख्य महत्वाचे उदिष्ट स्वाभिमान जागवणे हेच होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाने प्रत्येकाला स्वाभिमान शिकविलेला आहे.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.दुबई येथील डबल ट्री हॉटेल मध्ये स्वाभिमान इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड 2025 चे वितरण केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ना. रामदास आठवले बोलत होते.

स्वाभिमान फाऊंडेशन च्या वतीने स्वाभिमान इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड 2025 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात ना.रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. यावेळी ना.रामदास आठवले यांच्या हस्ते अनेक मान्यवरांना स्वाभिमान इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक संविधान फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.तीलक राज मलिक होते.तसेच यावेळी दुबई मधील गल्फ मेडिकल युनिव्हर्सिटी चे संस्थापक डॉ.थंबे मोहिदीन आणि अल् जोहरा हॉस्पिटलचे डॉ.राजु लोचन, फखर सिध्दीकी आदी मान्यवर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते

.0000

0

संबंधित पोस्ट

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये लष्करी कारवाई

मलेशियात क्वालालंपूर येथे झालेल्या 22 व्या आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

परस्पर सहकार्यामुळे महाराष्ट्र-सिंगापूर  व्यावसायिक संबंध अधिक दृढ- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल-महावाणिज्यदूतांनी दिले सिंगापूर नॅशनल डे रिसेप्शनचे निमंत्रण

vishwatmaklokswamivarta

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून शपथ,कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करणार आहेत.

vishwatmaklokswamivarta

नाफा मराठी चित्रपट महोत्सव २०२५उत्सवी वातावरणात संपन्न!अमेरिकन मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांचा मनमुराद आनंद घेतला! पुढील वर्षी नव्या उत्साहात, आणि अधिक देशांमध्ये ‘नाफा’ कार्यरत करण्याचा संकल्प”….

महत्त्वाची सूचना* मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी .