कबुतरांना वाचवा, मनःशांतीसाठी एक विशाल धार्मिक बैठक”
मुंबई प्रतिनिधी
,मुंबई मराठी पत्रकार संघ या ठिकाणी महावीर मिशन ट्रस्ट तर्फे संस्थापक प्रसिद्ध गोरक्षक, राष्ट्रीय संत मुनी नीलेश चंद्र विजयजी ,सुरेश पुनिमिया , रॅाकेश कोठारीया, तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होते. संत मुनी नीलेश चंद्र विजय यांनी पत्रकार आणि मीडिया यांच्याशी संवाद साधताना ,मुंबई परिसरातील महानगरपालिकेने अलिकडेच कबुतरखाना बंद केल्यामुळे, शांतता प्रस्थापित करणाऱ्या हजारो कबुतरांचा मृत्यू झाला आहे. ही घटना समाजातील करुणा, अहिंसा आणि प्राण्यांवरील दया या मूल्यांसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. या निष्पाप पक्ष्यांच्या मनःशांतीसाठी आणि समाजात अहिंसा आणि जीवनाच्या पावित्र्याचा संदेश पसरविण्यासाठी “विशाल धार्मिक बैठक” आयोजित केली जात आहे.या बैठकीमध्ये सकला जैन समाज, मुंबई; राजस्थानी छत्तीस कोम, मुंबई; भागीदार संस्था: महावीर मिशन ट्रस्ट; शेरी अँड दिया फाउंडेशन; कुलाबा सकल जैन संघ; जैन आंतरराष्ट्रीय सेवा संघटना (JISO) फाउंडेशन तसेच सर्व समाजाचे संत या धर्मसभा मध्ये सकाळी ८:३० वाजता ११ ।१०।२०१५ रोजी योगी सभागृह हॉलमध्ये हजर राहणार आहेत.या मध्ये बैठकीमध्ये कबुतराबाबत सर्व मुद्दे मांडले जाणार आहेत. जर सरकारकडून आम्हाला न्याय मिळाला नाही तर दिवाळीनंतर आमरण उपोषण करणार आहे.