vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आरोग्य यंत्रणांचा आढावा दिवाळी आरोग्यदायी व्हावी यासाठी खबरदारी घ्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

आरोग्य यंत्रणांचा आढावा दिवाळी आरोग्यदायी व्हावी यासाठी खबरदारी घ्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी नुकतीच झालेली अतिवृष्टी, त्यामुळे दूषित झालेले जलसाठे, दिवाळी सारख्या सणामुळे खाद्यपदार्थांतून होणाऱ्या भेसळीचा वाढता धोका या पार्श्वभुमिवर आरोग्य यंत्रणांनी अधिक सतर्क राहून दिवाळी आरोग्यदायी व्हावी यासाठी खबरदारी घ्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आरोग्य यंत्रणांना दिले.

 जिल्हा आरोग्य यंत्रणांचा आज आढावा घेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, महिला व बालविकास अधिकारी मंगला पांचाळ तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत वातावरणीय बदल व आरोग्य, नियमित लसीकरण, गोवर रुबेला लसीकरण, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण अभियान, एचआयव्ही एड्स नियंत्रण अभियान, गर्भलिंग निदान विरोधी अभियान , आपात्कालिन वैद्यकीय सेवा याबाबत आढावा घेण्यात आला.

 जिल्ह्यात रस्ते अपघातांची संख्या गेल्या वर्षा इतकीच असली तरी अपघातानंतर मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. याबाबत आरोग्य सेवांची समिक्षा करण्यात यावी. जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारावे यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शाळांमध्ये जाऊन आरोग्य विषयक मार्गदर्शन करावे,असे निर्देश त्यांनी दिले.

 अतिवृष्टिमुळे ग्रामिण भागात पाणीसाठे व स्रोत दूषित झाले आहेत. तसेच शहरी भागात सणाच्या पार्श्वभुमिवर अन्नपदार्थात भेसळ होण्याची शक्यता आहे. त्याविरुद्ध संबंधित विभागांनी बाजारात मिळणारे अन्न पदार्थ नमुने चाचणी करावी. ऐन सणासुदीत नागरिकांचे आरोग्य उत्तम राहिल यासाठी अरोग्य विभागाने खबरदारी घ्यावी. खेडोपाडी पाण्याचे नमुने तपासावे. नैमित्तिक संसर्ग उद्रेकांबाबत खबरदारी घ्यावी व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखावे,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

०००००

संबंधित पोस्ट

जीडीसी अँड ए’ परीक्षा 23 ते 25 रोजी ; प्रवेशपत्रासाठी आवाहन

vishwatmaklokswamivarta

शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांचीत्रैमासिक सांख्यिकी (ER 1) माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी

vishwatmaklokswamivarta

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे समता दिंडी, व्याख्यान, रॅली उत्साहात साजरी*

राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेची विधानसभेत घोषणाआदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार· ५० लाख कुटुंबांना लाभ

महाराष्ट्र शासनाचे २५ वर्षे मुदतीचे १,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते वृक्षारोपण