vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भाजपा जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने वंदेमातरम् गीताची १५० वर्षपूर्ती साजरी वंदेमातरम् गीताचे वंदेमातरम् हे दोन शब्द ऐकताच राष्ट्रभक्ती जागृत होते – माजी आमदार कैलास गोरंटयाल

भाजपा जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने वंदेमातरम् गीताची १५० वर्षपूर्ती साजरी वंदेमातरम् गीताचे वंदेमातरम् हे दोन शब्द ऐकताच राष्ट्रभक्ती जागृत होते – माजी आमदार कैलास गोरंटयाल

 

जालना (प्रतिनिधी) : वंदेमातरम् या राष्ट्रगीताने गौरवशाली १५० वर्ष पूर्ण केले, १९७५ मध्ये बक्किमचंद्र चटर्जी (चटोपोध्याय) यांनी हे गीत रचले होते, स्वातंत्र्याच्या चळवळीत प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये या गीताने राष्ट्रभक्तीची भावना निर्माण केली. असे त्यांनी आज दि ०७ नोव्हेंबर रोजी जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने भाजपा जिल्हा कार्यालय जिल्हा जालना येथे वंदेमातरम् गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर भांदरगे, राजेश राऊत, विमलताई आगलावे, विजय कामड, शुभांगीताई देशपांडे, संध्याताई देठे, अरुणाताई जाधव, सिद्धिविनायक मुळे, धनराज काबलीये, रमेश गौरक्षक, शिवप्रकाश चितळकर, सुनील खरे, महेश निकम, संजय डोंगरे, अमोल करंजेकर, श्रीमंत मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना ते म्हणाले की, या गीतामुळे स्वातंत्र्यसेनानी राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन मातृभूमीची रक्षा करण्यास सज्ज झाले. वंदेमातरम् या शब्दाचा अर्थ म्हणजे मी मातेला वंदन करतो आहे. १८९६ मध्ये कॉंग्रेसच्या अधिवेशनास रविंद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम हे गीत गायले व त्यानंतर हे गीत सार्वजनिक झाले. रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत गायल्या नंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीत या गीताने महत्वाची भूमिका बजावली. ब्रिटिशांनी या गीतावर बंदी आणली कारण त्यांना हे गीत भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीचे प्रतिक वाटत होते. सन १९०५ स्वदेशी चळवळीपासून ते १९४२ च्या भारत छोडो आंदोलनापर्यंत प्रत्येक आंदोलनात हे गीत वाजत होते. स्वातंत्र्यसेनानी जेंव्हा रस्त्यावर उतरत होते तेंव्हा वंदेमातरम् जयघोष करून जनता त्यांना प्रोत्साहन देत होती. व स्वातंत्र्यसेनानी यांनी या गीताला आपल्या चळवळीचा आधार बनविले. असे हे वंदेमातरम् दोन शब्द ऐकताच प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्रभक्ती जागृत होते असे त्यांनी सांगितले.

यावेळी सौ.शुभांगीताई देशपांडे, भावना मुळे, श्रीमंती रेणूताई घन, सौ.विशाखा नाईक यांनी वंदेमातरम् गीत, महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीत यांनी गायले.यावेळी या कार्यक्रमास विद्याताई कुलकर्णी, दीपा बिनीवाले, निलावती धावणे, विद्या देशमुख, अरुणा फुलमामडीकर, अश्विनी देशपांडे, वैशाली बनसोडे, पुष्पा मेहेत्रे, वर्षा ठाकूर, स्नेहा जोशी, सुरेखा बोटुळे, चंपालाल भगत, देविदास देशमुख, राजेश जोशी, रवी अग्रवाल, आनंद वाघमारे, विष्णू डोंगरे, बाबा उगले, गोवर्धन कोल्हे, सुभाष सले, बाबुराव भवर, शिवराज जाधव, किरण इंगळे, महादेव कावळे, सतीश अकोलकर, सोमेश काबलिये, सोपान पेंढारकर, रामलाल जाधव, प्रमोद गंडाळ, भागवत बावणे, कपिल दहेकर, दुर्गेश कुरील, राजेंद्र भोसले, आनंद झारकंडे, डोंगरसिंग साबळे, रोशन चौधरी, नेमीचंद भूरेवाल, तुलजेश चौधरी, राजू गवई, महेंद्र अकोले, सुहास मुंडे, गोविंद चीलवर, अविनाश देशपांडे, सतीश प्रभू, रणजीत रीडला, नागेश बेनिवाल, जितेंद्र संचेती, सेवाकराम नारीयलवाले, विकास कदम, रोहित खोडवे, सुदर्शन काळे, उमेश पेंढारकर, रोहित नलवडे, गौरव ठाकूर, अॅड. भगवान चांदोडे, गोविंद ढेंबरे, नागेश अंभोरे इत्यादीसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५-२६ निमित्त रायगड जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन २९ ऑक्टोबर रोजी होणार जिल्हास्तर स्पर्धा; युवक-युवतींना सहभागासाठी आवाहन

vishwatmaklokswamivarta

महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी घेतला सर्वसाधारण सभेतील मंजूर ठरावांवरील कार्यवाहीचा आढावा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील. असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स या ट्विटरवर म्हंटले आहे

vishwatmaklokswamivarta

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुख्य सचिव यांनी सपत्नीक दर्शन घेतले

जिल्ह्याची आता परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल – पालकमंत्री ना. मकरंद पाटील• बुलढाणा जिल्हा भक्ती-शक्तीचा सुरेख संगम..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील 80 शाळांमध्ये राबविणार ‘शाळा सुरक्षा कार्यक्रम’;300 आपदा मित्र व सखी देणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

vishwatmaklokswamivarta