vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शुक्रवारी सांगलीत,उरूण ईश्वरपूरमध्ये शनिवारी पदयात्रा…

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शुक्रवारी सांगलीत,उरूण ईश्वरपूरमध्ये शनिवारी पदयात्रा…

सांगली, प्रतिनिधी) : राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शुक्रवार, दि. 14 नोव्हेंबर रोजी सांगली येथे व शनिवार, दि. 15 नोव्हेंबर रोजी उरूण ईश्वरपूरमध्ये पदयात्रेचे आयोजन केल्याची माहिती मेरा युवा भारत, सांगलीचे जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. हा कार्यक्रम आणि उपक्रम माय भारत पोर्टलवर होत आहे. या पोर्टलवर नोंद करून जिल्ह्यातील नागरिकांनी या ऐतिहासिक उपक्रमात सहभागी होऊन सक्रियपणे सहकार्य करावे, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकात करण्यात आले आहे.

पहिली “जिल्हास्तरीय युनिटी मार्च/पदयात्रा” दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता तरुण भारत स्टेडियम सांगली येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली या ठिकाणी समाप्त होईल. तसेच दुसरी जिल्हास्तरीय युनिटी मार्च/पदयात्रा दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 वा. उरूण ईश्वरपूर येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी काढण्यात येणार आहे.

मेरा युवा भारत (युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) यांच्यामार्फत 2025 हे वर्ष भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. याचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान संपूर्ण भारतभर जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित केल्या जाणार आहेत. या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात या दोन “जिल्हास्तरीय युनिटी मार्च/पदयात्रा” आयोजित केल्या जात आहेत.

      या पदयात्रेसोबत स्वच्छता मोहीम, व्यसनमुक्ती मोहीम, सरदार पटेल यांच्या विचारावर चर्चासत्रे, वादविवाद स्पर्धा इत्यादी आयोजित केल्या जाणार आहेत. या उपक्रमात जिल्हा प्रशासन, माय भारत, शाळा, महाविद्यालय, स्थानिक युवा संघटना, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक आणि भारत स्काऊट गाईड युनिट्स यांचा सहभाग असेल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

0000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

मार्चअखेर सुट्ट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार;* *खरेदी-विक्री व्यवहारांसाठी मोठा दिलासा*

रायगड जिल्ह्यात 24 जून ते 08 जुलै 2025 दरम्यान जमावबंदी लागू     –अपर जिल्हादंडाधिकारी

vishwatmaklokswamivarta

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्हाधिकारी कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली-कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले-जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

vishwatmaklokswamivarta

दिल्लीत गणरायाचे भक्तिमय स्वागत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गणरायाची प्राणप्रतिष्ठा; महाराष्ट्र सदनासह मंडळांमध्ये उत्साहाचा जयघोष

अंबरनाथकरांना शाश्वत व स्वच्छ पाणी देण्यासाठी नियोजन करावे- पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील