vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वसतिगृहांतील रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक ते सर्व करा• जिल्हाधिकारी अशोक काकडे -जिल्हास्तरीय वसतिगृह निरीक्षण बैठकीत सूचना

वसतिगृहांतील रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक ते सर्व करा• जिल्हाधिकारी अशोक काकडे -जिल्हास्तरीय वसतिगृह निरीक्षण बैठकीत सूचना

            सांगली, प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाची 21 वसतिगृहे आहेत. यामध्ये 1 हजार 364 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला आहे. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहे व निवासी शाळांतील उर्वरित रिक्त जागा शंभर टक्के भरण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या.

जिल्हास्तरीय वसतिगृह निरीक्षण समितीची बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण बाळासाहेब कामत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर आणि के. पी. मुधाळे, जिल्ह्यातील वसतिगृहांचे अधीक्षक आदि उपस्थित होते.

 यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळा व वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. त्यांची माहिती पालकांपर्यंत पोहोचवावी. या रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक ते सर्व करावे. याबाबतचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. तसेच, सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल व फायर ऑडिट करून घ्यावे. तसेच, प्रवेशित विद्यार्थ्यांना आपत्कालिन व्यवस्थापनाचे धडे द्यावेत, असे त्यांनी सूचित केले.

या बैठकीत शासकीय वसतिगृहातील सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची प्रवेशस्थिती, शासकीय इमारत बांधकाम व दुरूस्ती, वसतिगृह बांधकामासाठी जमीन प्राप्त असलेल्या परंतु अद्याप इमारत बांधकाम सुरू न झालेली वसतिगृहे, सामाजिक न्याय भवन, सांगली येथील इमारतीच्या डोम दुरूस्ती, वसतिगृहातील सोयी सुविधा, वसतिगृह प्रवेशितांची आरोग्य तपासणी, मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

00000

संबंधित पोस्ट

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

नदीपात्रातून अतिरिक्त वाळू उत्खनन प्रकरणी ५६ कोटी ६८ लाखांचा दंड;महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे दोषी अधिकारी निलंबित— महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात ‘बालस्नेही ग्रामपंचायत’ आणि ‘बालस्नेही प्रभाग’ उपक्रम राबविणार – मंत्री आदिती तटकरे बालकांचे आरोग्य, शिक्षण, सुरक्षा आणि हक्कांवर विशेष भर

ठाणे जिल्ह्यात “उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम” अंतर्गत २ हजार ३६५ केंद्रांवर परीक्षा संपन्न जिल्ह्यात २५ हजार ९७६ असाक्षर परिक्षार्थींनी दिली परीक्षा

पोषण अभिसरण समिती व कुपोषण निर्मूलन टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली

vishwatmaklokswamivarta

भारतभेटीने प्रभावित झाल्याची पॅराग्वे राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना यांची भावनापॅराग्वेच्या राष्ट्राध्यक्षांचे राजभवन येथे स्वागत-संघटित गुन्हेगारी, ड्रग माफियांचे संकट दूर करण्यासाठी पॅराग्वेला सहकार्याची अपेक्षा..