vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सकलेचा नगरवासीयांची नागरी समस्यांपासून होणार मुक्तता, भास्कर आबा दानवे यांच्या पुढाकाराने कामांना सुरुवात…

सकलेचा नगरवासीयांची नागरी समस्यांपासून होणार मुक्तता, भास्कर आबा दानवे यांच्या पुढाकाराने कामांना सुरुवात…

जालना (प्रतिनिधी): शहरातील सकलेचा नगर भागात उघडी गटारे, रस्त्यावर तुंबलेले पाणी, बंद पथदिवे अशा नागरिक समस्यांनी येथील रहिवाशांचे जगणे मुश्किल केले होते. महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कुठलीच दखल घेतली जात नसल्याने अखेर भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे यांच्याकडे रहिवाशांनी कैफियत मांडली असता त्यांनी तातडीने यंत्रणा हालवून शनिवारी ( ता.29) प्रत्यक्ष कामास सुरुवात केली.

संकलेचा नगर भागात गुत्तेदाराने नालीचे बांधकाम अर्धवट सोडून भुयारी गटाची जोडणी व्यवस्थित केली नव्हती.गटारावर ढापे न टाकता उघडे ठेवून पेवर ब्लॉक सुद्धा बसवले नाही ,परिणामी परिसरात रस्त्यावर तुंबलेल्या गटारीच्या पाण्यातून रहिवाशी, शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागत होती. बंद पथदिव्यांमुळे चोऱ्यांचे प्रमाणही वाढले होते. वर्षभरापासून मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने येथील रहिवाशी मेटा कुटीस आले. दोन दिवसापूर्वी भास्करराव पाटील दानवे यांनी या भागात भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.आज सकाळी यंत्रणेसह प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. त्याबद्दल रहिवाशांनी रमेशचंद्र अग्रवाल ( फरशीवाले ) यांच्या निवासस्थानी भास्करराव पाटील दानवे यांचा सत्कार केला.

यावेळी माजी नगरसेवक जीवन सले, सुनील राठी, धनराज काबलीये, रमेशचंद्र अग्रवाल ( फरशीवाले ) ,प्रवीण मोहता ,शांतीलाल सकलेचा ,अरुण अग्रवाल, द्वारकादास चेचानी ,कैलासचंद आगीवाल, पंकज गौड ,सौरभ सकलेचा ,नितीन अग्रवाल ,आदेश कोटेचा ,प्रकाश आगीवाल, रामेश्वर मंत्री ,रोहित नलावडे ,चोरमारे यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

0000

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या बैठकीत राज्यातील महत्वाच्या विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा..!

मुंबईतील उंच इमारतींसाठी अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात येणार- मंत्री उदय सामंत

मंत्रालयात पत्रकारांना मज्जाव – ‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून तीव्र निषेध! पत्रकारांना थांबवणं म्हणजे लोकशाहीला गप्प करणं – संदीप काळे 

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी- मुंबईतील चेंबुरमध्ये एकावर गोळीबार.अज्ञात आरोपिनी गाडीतून येऊन एकावर केला गोळीबार.

आरक्षण सोडत – हरकती व सूचना 17 ऑक्टोबरपर्यंत स्वीकारणार- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

घाणेवाडी तलावाच्या पूर्णतः क्षतीग्रस्त सांडव्याची तातडीने दुरुस्ती करावी- संजय लाखेपाटील यांनी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडे केली मागणी