सकलेचा नगरवासीयांची नागरी समस्यांपासून होणार मुक्तता, भास्कर आबा दानवे यांच्या पुढाकाराने कामांना सुरुवात…
जालना (प्रतिनिधी): शहरातील सकलेचा नगर भागात उघडी गटारे, रस्त्यावर तुंबलेले पाणी, बंद पथदिवे अशा नागरिक समस्यांनी येथील रहिवाशांचे जगणे मुश्किल केले होते. महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कुठलीच दखल घेतली जात नसल्याने अखेर भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे यांच्याकडे रहिवाशांनी कैफियत मांडली असता त्यांनी तातडीने यंत्रणा हालवून शनिवारी ( ता.29) प्रत्यक्ष कामास सुरुवात केली.
संकलेचा नगर भागात गुत्तेदाराने नालीचे बांधकाम अर्धवट सोडून भुयारी गटाची जोडणी व्यवस्थित केली नव्हती.गटारावर ढापे न टाकता उघडे ठेवून पेवर ब्लॉक सुद्धा बसवले नाही ,परिणामी परिसरात रस्त्यावर तुंबलेल्या गटारीच्या पाण्यातून रहिवाशी, शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागत होती. बंद पथदिव्यांमुळे चोऱ्यांचे प्रमाणही वाढले होते. वर्षभरापासून मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने येथील रहिवाशी मेटा कुटीस आले. दोन दिवसापूर्वी भास्करराव पाटील दानवे यांनी या भागात भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.आज सकाळी यंत्रणेसह प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. त्याबद्दल रहिवाशांनी रमेशचंद्र अग्रवाल ( फरशीवाले ) यांच्या निवासस्थानी भास्करराव पाटील दानवे यांचा सत्कार केला.