vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सकलेचा नगरवासीयांची नागरी समस्यांपासून होणार मुक्तता, भास्कर आबा दानवे यांच्या पुढाकाराने कामांना सुरुवात…

सकलेचा नगरवासीयांची नागरी समस्यांपासून होणार मुक्तता, भास्कर आबा दानवे यांच्या पुढाकाराने कामांना सुरुवात…

जालना (प्रतिनिधी): शहरातील सकलेचा नगर भागात उघडी गटारे, रस्त्यावर तुंबलेले पाणी, बंद पथदिवे अशा नागरिक समस्यांनी येथील रहिवाशांचे जगणे मुश्किल केले होते. महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कुठलीच दखल घेतली जात नसल्याने अखेर भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे यांच्याकडे रहिवाशांनी कैफियत मांडली असता त्यांनी तातडीने यंत्रणा हालवून शनिवारी ( ता.29) प्रत्यक्ष कामास सुरुवात केली.

संकलेचा नगर भागात गुत्तेदाराने नालीचे बांधकाम अर्धवट सोडून भुयारी गटाची जोडणी व्यवस्थित केली नव्हती.गटारावर ढापे न टाकता उघडे ठेवून पेवर ब्लॉक सुद्धा बसवले नाही ,परिणामी परिसरात रस्त्यावर तुंबलेल्या गटारीच्या पाण्यातून रहिवाशी, शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागत होती. बंद पथदिव्यांमुळे चोऱ्यांचे प्रमाणही वाढले होते. वर्षभरापासून मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने येथील रहिवाशी मेटा कुटीस आले. दोन दिवसापूर्वी भास्करराव पाटील दानवे यांनी या भागात भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.आज सकाळी यंत्रणेसह प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. त्याबद्दल रहिवाशांनी रमेशचंद्र अग्रवाल ( फरशीवाले ) यांच्या निवासस्थानी भास्करराव पाटील दानवे यांचा सत्कार केला.

यावेळी माजी नगरसेवक जीवन सले, सुनील राठी, धनराज काबलीये, रमेशचंद्र अग्रवाल ( फरशीवाले ) ,प्रवीण मोहता ,शांतीलाल सकलेचा ,अरुण अग्रवाल, द्वारकादास चेचानी ,कैलासचंद आगीवाल, पंकज गौड ,सौरभ सकलेचा ,नितीन अग्रवाल ,आदेश कोटेचा ,प्रकाश आगीवाल, रामेश्वर मंत्री ,रोहित नलावडे ,चोरमारे यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

0000

संबंधित पोस्ट

बीड-परळी रेल्वेमार्गासाठी उर्वरित भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश महत्वाच्या विकास प्रकल्पांचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा मुक्तीसंग्राम दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन दि.१५ सप्टेंबर पासून…

vishwatmaklokswamivarta

विधानसभानिवडणूक2024 -मतदानपूर्व 72 तास कालावधीत  आचारसंहिता उल्लंघनाबाबत योग्य कार्यवाही करा —-जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजना ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वीत करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत..

vishwatmaklokswamivarta

डी.एल.एड्. प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज भरण्यास 10 जून मुदत…

भारतीय राज्यघटनेची उद्देशिका जिल्ह्यातील १० लाख घरांपर्यंत पोहोचवू – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते “घर घर संविधान” उपक्रमाचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta