vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील ६९३ ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर-– जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जिल्ह्यातील ६९३ ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर-– जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना, प्रतिनिधी-केंद्र सरकारच्या WINDS (Weather Information Network Data System) प्रकल्पाअंतर्गत जालना जिल्ह्यातील ६९३ ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र (AWS – Automatic Weather Station) बसविण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी दिली.

  जिल्ह्यात दरवर्षी पावसाळ्यात प्रत्येक गावात झालेल्या पर्जन्यमानाची अचूक व विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध होत नसल्याने, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आला होता. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीकडून आवश्यक प्रस्ताव मागविण्यात आले होते.

 जालना जिल्ह्यात एकूण ७९१ ग्रामपंचायती असून, त्यापैकी ४९ ग्रामपंचायतींमध्ये यापूर्वीच स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींपैकी ६७१ ग्रामपंचायतींमध्ये शासकीय जागेत, तर २२ ग्रामपंचायतींमध्ये भाडेतत्त्वावर जागा घेऊन स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

    यासंदर्भातील सर्व प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले असून, ते शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता यासह हवामानविषयक अचूक माहिती उपलब्ध होणार असून, शेती नियोजन, पीक विमा, आपत्ती व्यवस्थापन व शेतकऱ्यांच्या निर्णय प्रक्रियेस मोठा लाभ होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी नमूद केले.

संबंधित पोस्ट

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीरण योजना; मुंबई उपनगर जिल्ह्यातील संस्थाना १४ नोव्हेंबरपर्यंत अर्जाची मुदत

vishwatmaklokswamivarta

इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरणामुळेमहाराष्ट्रात उद्योजकांसाठी पोषक वातावरण— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात पुढाकार घेण्याचे केले आवाहन

जिल्ह्यात उष्मालाटेचा ‘यलो अलर्ट’ ; उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणिमार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• डाटा सुरक्षिततेसाठी ज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील भागीदार संस्थासोबत सामंजस्य करार

दिव्यांगांप्रती सन्मान आवश्यक आहे. दिव्यांगासाठी आता स्वतंत्र विभागाची स्थापना झाली असल्याने त्यांना मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ सुलभ होण्यास मदत झाली असून जिल्हा प्रशासन दिव्यांगांना सक्षम बनविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी केले.

vishwatmaklokswamivarta

ऐरोली विधानसभा मतदारसंघात मतदारांच्या मॅपिंगसाठी विशेष मोहीम; २००२ च्या मतदार यादीशी होणार पडताळणी*