vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डावी लोकशाही आघाडीने जालना महानगर पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपला पाठींबा जाहीर

 डावी लोकशाही आघाडीने जालना महानगर पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपला पाठींबा जाहीर

राज्य प्रतिनिधी-डावी लोकशाही आघाडीने जालना महानगर पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपला पाठींबा जाहीर केला आहे सदरील पाठिंब्याचे पत्र कॉ.अण्णा सावंत,अफसर मिर्झा,नजीर पठाण यांनी आज काँग्रेस चे तालुका अध्यक्ष श्री कृष्णा पा.पडूळ यांना सुपूर्द केले.

        सदरील पत्रकात म्हंटले आहे कि, जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ ही अटीतटीची होत असून सदरील निवडणूक ही जालना शहराचा विकास व नागरी सुविधा या विषयावर व्हायला पाहिजे असे डावी लोकशाही आघाडीला वाटते. सदरील निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि शिवसेना हे घटक पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकलेले आहेत, महाराष्ट्रात महायुतीची सत्ता असून सुद्धा त्यांनी जालना शहराच्या विकासाकडे व नागरी सुविधांकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीने झोपडपट्टीवासियांना पी.आर.कार्ड देण्याचे व नागरी सुविधा देण्याचे आश्वासन दिले परंतु आजपर्यंत ते पूर्ण केलेले नाही व यापुढे ही भाजप व शिवसेना हे आश्वासन पूर्ण करणार नाही

        म्हणून डावी लोकशाही आघाडीतील घटक पक्ष, संघटना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष,पीस फौंडेशन जालना, सामाजिक समता संघर्ष समिती यांनी ठरवलेले आहे कि, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या उमेदवारांचा पराभव करून महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (श.प.) च्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करून जालनेकरांची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन डावी लोकशाही आघाडी तर्फे सर्व मतदारांना करण्यात येते.

       सदरील पाठिंबा पत्रावर कॉ. अण्णा सावंत,कॉ. देविदास जिगे, अॅड. शिवाजी आदमाने, अफसर मिर्झा, मारोती खंदारे, कृष्णा डवले, शेख मोईन, मधुकर मोकळे, प्रल्हाद पडूळ, अनिल मिसाळ, दिलीप साठे, आमेर शेख, एजाज शहा, मोहम्मद रियाज, बाबासाहेब पाटोळे, मिर्झा कैसर यांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत.

-0000

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ‘गोदा ते नर्मदा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा’ आयोजित

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल! राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, तर निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार. आजपासून आचारसंहिता लागू! राज्य निवडणूक आयोगाची घोषणा….

vishwatmaklokswamivarta

इंडिया पोस्ट फोरमची बैठक संपन्न

वैद्यकीय पर्यटन सुरू करावे- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

दिल्लीच्या मराठी संमेलनाविरोधात विद्रोहीचा आवाज घुमणार छ.संभाजीनगरातअध्यक्ष,उद्घाटक व तीन दिवसांची भरगच्च कार्यक्रम पत्रिका जाहीर !

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय जनगणना कार्यक्रमाला प्रारंभ;स्वगणनेचा पहिला टप्पा सुरू पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय शुभारंभ स्वगणना करून राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्याचे आवाहन