vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हिंद दि चादर”अंतर्गत नरसी नामदेव येथे आज वारकरी संमेलन;* पूर्वतयारीचा घेतला आढावा

“हिंद दि चादर”अंतर्गत नरसी नामदेव येथे आज वारकरी संमेलन;* पूर्वतयारीचा घेतला आढावा

हिंगोली, प्रतिनिधी: नांदेड येथे दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या “हिंद दि चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांचा एक भाग म्हणून संत नामदेव महाराज यांच्या पावन भूमीवर नरसी नामदेव येथे उद्या सोमवार, (दि. १९) रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य वारकरी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

सदर वारकरी संमेलनाच्या अनुषंगाने आज कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा समाजबांधवांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

या पूर्वतयारी पाहणीवेळी हिंद दि चादर”च्या नांदेड क्षेत्रिय समितीचे अशासकीय सदस्य ॲड. संतोष राठोड, संत नामदेव मंदिर ट्रस्टचे सचिव द्वारकादास सारडा, सुखबीर सिंग अलग, अंबादास दळवी, संदीप राठोड, विकास राठोड, प्रीतम राठोड, सचिन जाधव यांच्यासह अन्य मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते.

उद्या होणाऱ्या या वारकरी संमेलनातून संत नामदेव महाराजांच्या विचारांचा प्रसार होऊन सामाजिक एकात्मता, सद्भावना व आध्यात्मिक जागृतीला चालना मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्थेबाबत सविस्तर पाहणी करून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
***

 

संबंधित पोस्ट

आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार अनुकंपाचा अनुशेष संपणार !· 4 ऑक्टोबरला 10,309 नियुक्तीपत्रे प्रदान करणार, यात 5187 अनुकंपा उमेदवार

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

इंद्रायणी नदी वरील पूल कोसळून झालेली घटना दुर्दैवी आणि वेदनादायी — उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई होणार 

पलूसच्या जवाहर नवोदय विद्यालयात 11 वी प्रवेशासाठी 10 ऑगस्टची मुदत..

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल – इंदापूर टप्प्याचे काम,डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार· राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची माहिती..

vishwatmaklokswamivarta