vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

इयत्ता बारावी परीक्षेला आज मंगळवारपासून सुरुवात; कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज,विद्यार्थ्यांनी दडपण न बाळगता सकारात्मकपणे परीक्षेला सामोरे जावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

इयत्ता बारावी परीक्षेला आज मंगळवारपासून सुरुवात; कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज,विद्यार्थ्यांनी दडपण न बाळगता सकारात्मकपणे परीक्षेला सामोरे जावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

राज्य प्रतिनिधी-लातूर जिल्ह्यात 10 फेब्रुवारीपासून पासून इयत्ता बारावी परीक्षेस प्रारंभ होत असून, विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना, गैरप्रकाराला बळी न पडता, आपण वर्षभर केलेला अभ्यास व मेहनतीच्या जोरावर सकरात्मकपणे परीक्षेला सामोरे जावे. कोणतेही दडपण न बाळगता योग्य रीतीने उत्तर पत्रिकेत मांडणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

परीक्षा केंद्रावर अचानकपणे भेट देण्यासाठी भरारी पथकाची व कायमस्वरूपी बैठे पथकाची व्यवस्था करण्यात आली असून, कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक दक्षता घेतली आहे. विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षेस सामोरे जाण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन व समुपदेशन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास सबंधित विद्यार्थी, पर्यवेक्षक व केंद्र संचालक यांच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येणारआहे. तसेच परीक्षा कालावधीत, परीक्षा केंद्रावर दूरदृष्य प्रणालीद्वारे देखरेख करण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयात स्वतंत्र संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी राहुल कुमार मीना यांनी दिली आहे.

जिल्ह्यात १०१ परीक्षा केंद्रांवर इयत्ता बारावीची परीक्षा होणार असून ३६ हजार ५११ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. प्रत्येक परीक्षा कक्षात, परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांनी काय करावे, काय करू नये, याबाबतच्या सूचना प्रत्येक परीक्षा केंद्राच्या सूचनाफलकावर लावण्यात येणार आहेत. तालुकास्तर, जिल्हा परिषद स्तरावर व जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर झूम ॲपचा वापर करुन वॉर रुम स्थापित करण्यात येणार असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर त्रिस्तरीय नजर व निगराणी ठेवली जाणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रास व परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात असेल आणि परीक्षा कालावधीत सर्व परीक्षा केंद्रवार व परिसरामत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येणार आहेत, अशी माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय मठपती यांनी दिली.

****

संबंधित पोस्ट

आज बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाल्याची धक्कादायक बातमी…

vishwatmaklokswamivarta

पाणीपट्टी वसुलीत उर्ध्व वर्धा प्रकल्प अव्वल

AICCTU देशव्यापी संपाला पाठिंबा, जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन*मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेची नियोजन बैठक संपन्न***

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन;युवक-युवती व संस्थांकडून 8 एप्रिलपर्यंत अर्ज आमंत्रित

जिल्ह्यात आसपासच्या परिसरामध्ये अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क साधावा

दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ, वारीत ठरतोय लक्षवेधीआपत्ती व्यवस्थापन विभागाची वारीत जनजागृतीची प्रभावी मोहीम