vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सेवाकर्मी पुरस्कार” कार्यक्रमात जिल्हा परिषद ठाणेची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कार्यालयांमध्ये स्थान – १०० पैकी ८० गुणांकन…

सेवाकर्मी पुरस्कार” कार्यक्रमात जिल्हा परिषद ठाणेची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कार्यालयांमध्ये स्थान – १०० पैकी ८० गुणांकन…

ठाणे, प्रतिनिधी – सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित “सेवाकर्मी + पुरस्कार” कार्यक्रमांतर्गत राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यांकनात जिल्हा परिषद ठाणे यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवत १०० पैकी ८० गुणांकन मिळवून “सेवाकर्मी पुरस्कार” प्राप्त केला आहे. राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये स्थान मिळविणे ही जिल्हा परिषद ठाणेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

या मूल्यांकनासाठी शासनाच्या विविध निकषांनुसार प्रशासनिक कार्यपद्धती, सेवाविषयक नोंदींचे व्यवस्थापन, कर्मचारी सेवा विषयक पारदर्शकता, वेळेवर नोंदी अद्ययावत ठेवणे, शासकीय सेवा नियमांचे पालन तसेच कार्यालयीन कामकाजातील शिस्त आणि गुणवत्तेचा सखोल आढावा घेण्यात आला.

गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवा नोंदींचे संगणकीकरण, सेवाज्येष्ठता सूची विहित कालावधीत प्रसिद्ध करणे, भरती व पदोन्नती अंतर्गत विहित निकषानुसार नियुक्ती देणे, iGOT पोर्टल ( कर्मयोगी पोर्टल) वरील प्रशिक्षण पुर्ण करून घेणे तसेच कर्मचारी व्यवस्थापनातील पारदर्शकता या बाबींमध्ये विशेष प्रगती करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचारी सेवा पुस्तिका अद्ययावत ठेवणे, संवर्गनिहाय माहितीचे शिस्तबद्ध संकलन व शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन ही बाब गुणांकनामध्ये महत्त्वाची ठरली.

कार्यालयीन कामकाजातील सुसूत्रता, ई-प्रणालींचा प्रभावी वापर, तसेच कर्मचारी विषयक कामांमध्ये वेग आणि अचूकता राखल्यामुळे जिल्हा परिषद ठाणे यांना उच्च गुणांकन मिळाले आहे. या यशामागे अधिकारी-कर्मचारी यांचे समन्वयित प्रयत्न, प्रशासनातील शिस्तबद्धता आणि सेवा वितरणातील गुणवत्ता कायम ठेवल्याने महत्त्वाची ठरली आहे.

या यशाबद्दल जिल्हा परिषद ठाणे प्रशासनाने सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे अभिनंदन केले असून, भविष्यातही प्रशासनिक कामकाज अधिक परिणामकारक व पारदर्शक ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

000

संबंधित पोस्ट

नांदेड विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीसाठी 8 उमेदवारांचे 17 नामनिर्देशन अर्ज दाखल

नोंदणीकृत माथाडी बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटप करण्याची सय्यद अशफाक अली यांची मागणी

जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेचा संवेदनशील समन्वय,मेंदूमृत रूग्णाच्या अवयवदानातून तिघांना मिळाले जीवनदान..!- हरिपूरचे दीपक धर्माधिकारी मृत्यूनंतरही अवयवरूपी जिवंत राहणार

vishwatmaklokswamivarta

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती चंद्रशेखर यांची निवड.

vishwatmaklokswamivarta

सायबर फसवणूक झाल्यास विनाविलंब तक्रार द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायबर फसवणूक तक्रारीसाठी ‘गोल्डन अवर’ महत्वाचा

vishwatmaklokswamivarta

२९ जानेवारी 📰 भारतीय वृत्तपत्र दिवस…

vishwatmaklokswamivarta