vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

बार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण

बार्टी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने की अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक व युवतींसाठी निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 प्रशिक्षणा दरम्यान संबंधित विषयाचे प्रात्यक्षिकासह तांत्रिक ज्ञान व उद्योजकीय ज्ञान देण्यात येईल. उद्योग उभारणी, शासकीय कर्ज /अनुदान योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल, विक्री कला, उद्योग व्यवस्थापन, उद्योगांना भेटी, कर कायदा, लायसन्स याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे प्रशिक्षण दिले जाईल.

प्रशिक्षणार्थ्यांची निवड प्रवेश मुलाखती द्वारे केली जाणार आहे. प्रशिक्षणार्थी हा वय वर्षे १८ ते ४५ वयोगटातील असावा, अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा, एक महिना कालावधीच्या प्रशिक्षणासाठी किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता १० वी उत्तीर्ण व दोन महिने कालावधीच्या प्रशिक्षणासाठी किमान पदवीधर (Engineering, Polytechnic, MCA, BCA, MSC, BSC यांना प्राधान्य). गत पंधरा वर्षांपासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा तसेच स्वतःचा स्वयंरोजगार/रोजगार करण्याची तयारी असावी. प्रवेश अर्जासोबत आधार कार्ड, फोटो, स्वतःचा जातीचा दाखला, अंतिम सत्र गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला जोडणे आवश्यक आहे.

 इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED), जिल्हा कार्यालय, अ-३८, MIDC रेल्वे स्टेशन परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे भारती सोसे, प्रकल्प अधिकारी MCED, मो. 9168667122 किंवा कार्यक्रम आयोजक MCED, मो. 7620445510, मो. 8421344654 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय अधिकारी सुभाष थोटे व प्रकल्प अधिकारी योगेश सोनवणे, (BARTI) यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजीनगर येथील बालसुधारगृह प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रशासन हे सुशासन करण्यात ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांचे मोलाचे योगदान – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने बुधवार दि. ०९ जुलै ते शुक्रवार दि. ११ जुलै या कालावधीत आयोजित केलेल्‍या श्री गुरूपौर्णिमा उत्‍सव कालावधीत तीन दिवसात साईंच्या चरणी अर्पण रु.६,३१,३१,३६२/-,सहा कोटी, एकतीस लाख, एकतीस हजार, तिनशे बासष्‍ट मात्र) इतकी देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे भारत पर्यटनकडून बी2बी पर्यटन मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर जिल्ह्यातील ४४ नागरिकांची एनडीआरएफ कडून यशस्वी सुटका

बौद्ध समाज सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना अनुदान…

vishwatmaklokswamivarta