vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हिंद दि चादर कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून चार बस रवाना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दाखवला हिरवा झेंडा- शनिवारी 3 बस होणार रवाना- जिल्ह्यातील 296 नागरिक होणार सहभागी

हिंद दि चादर कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून चार बस रवाना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दाखवला हिरवा झेंडा- शनिवारी 3 बस होणार रवाना- जिल्ह्यातील 296 नागरिक होणार सहभागी

सांगली, प्रतिनिधी: श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च 2026 या कालावधीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सांगली जिल्ह्यातील नागरिकांना घेऊन आज चार बस रवाना झाल्या. पैकी शीख संत आश्रम गुरूद्वारा, टिंबर एरिया, सांगली येथून नागरिकांना घेऊन जाणाऱ्या दोन बसना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी हिरवा झेंडा दाखवला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, सांगली अपर तहसिलदार अश्विनी वरूटे, अन्य अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना घेऊन झुलेलाल मंदिर शामरावनगर सांगली येथून एक आणि उमदी (ता. जत) येथून एक बस रवाना झाली. या चारही बसमधून एकूण 173 नागरिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आज रवाना झाले.

28 फेब्रुवारीला सकाळी 3 बस रवाना होणार आहेत. त्यामध्ये सांगली बसस्थानक येथून दोन बस आणि पलूस बसस्थानक येथून एक बस रवाना होणार आहे. या बसमधून जाणारे 123 नागरिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सात बसद्वारे सांगली जिल्ह्यातून एकूण 296 नागरिक सहभागी होणार आहेत. या सर्वांना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शुभेच्छा दिल्या.

00000

संबंधित पोस्ट

वारणा धरणात 31.42 टी.एम.सी. पाणीसाठा…

दिल्लीतील बहु चर्चित मद्य घोटाळा प्रकरणातील आम आदमी पार्टीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सह 23 आरोपीची निर्दोष मुक्तता…

इलेक्ट्रीक बसेसच्या माध्यमातून प्रदूषणास आळा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील महापालिकेच्या ई- बस सेवा डेपोचे बांधकाम, विद्युतीकरणाच्या कामाचे भूमिपूजन

सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराचा हात,जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते रिक्षा व यंत्रसामग्री वाटप..

vishwatmaklokswamivarta

देहर्जे प्रकल्पबाधितांना भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी मलवाडा पॅटर्न तयार करा – मंत्री गणेश नाईक

अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे – मंत्री प्रताप सरनाईक,रस्ता सुरक्षा निधीतील कामांसह निधी वापराबाबत नियमावली करा…

vishwatmaklokswamivarta