vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

नवीन रास्त भाव दुकानांसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी पुरवठा विभागाचे आवाहन*

नवीन रास्त भाव दुकानांसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी पुरवठा विभागाचे आवाहन*

 

 

सातारा प्रतिनिधी: सातारा जिल्हयातील कार्डधारकांची होणारी गैरसोय दूर करण्याकरीता 122 गावांमध्ये नवीन रास्त भाव दुकाने प्राधान्यक्रमानुसार मंजुर करण्याच्या दुष्टीने जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. नवीन रास्त भाव दुकानाच्या मंजूरीकरीता संबंधित ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिलांच्या स्वयंसहाय्यता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था यापैकी ज्यांना अर्ज करावयाचे असतील, त्यांनी संबंधित तहसिल कार्यालय, पुरवठा शाखा यांचेकडे संपर्क साधून 1 जानेवारीपासून 31 जानेवारी 2025 अखेर आवश्यक त्या कागदपत्रांसह तहसिलदारांकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

नवीन रास्तभाव दुकान प्राधान्यकमानुसार मंजूरी करीता सातारा तालुक्यातील 10 गावे, वाई तालुक्यातील 17 गावे, कराड तालुक्यातील 7 गावे, महाबळेश्वर तालुक्यातील 44 गावे, कोरेगाव तालुक्यातील 10 गावे, खटाव तालुक्यातील 9 गावे, फलटण तालुक्यातील 4 गावे, पाटण तालुक्यातील 7 गावे, माण तालुक्यातील 5 गावे, खंडाळा तालुक्यातील 9 गावे, अशा एकूण 122 गावांचा समावेश आहे. विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.000

संबंधित पोस्ट

उसाच्या दरात यंदाही ‘समृद्धी’च वरचढ ! : शेतकऱ्यांना २९७० रूपये एफआरपी देण्याची कारखान्याची घोषणा  200 रुपयांचा दुसरा हप्ता लवकरच खात्यात होणार जमा : चेअरमन सतीश घाटगे  

जिल्ह्यातील 80 शाळांमध्ये राबविणार ‘शाळा सुरक्षा कार्यक्रम’;300 आपदा मित्र व सखी देणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

vishwatmaklokswamivarta

पाथ्रीकर कॅम्पस बदनापुर येथे भारतीय जनऔषधी दिवस कार्यक्रम संपन्न

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन प्रश्‍न मार्गी लावू; ‘दादांचा वादा’प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्यवतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन..

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केले संबोधित.

vishwatmaklokswamivarta

धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकांसाठी खाटा राखीव ठेवणे बंधनकारक प्रभावी अंमलबजावणीसाठी रुग्णालयांची तपासणी करावी – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे