vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विधानपरिषदकामकाज….

विधानपरिषदकामकाज

विशेष प्रतिनिधी -विधानपरिषदकामकाज

बिबट्यांचा समावेश वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील अनुसूची-१ मधून अनुसूची-२ मध्ये करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे ५डिसेंबर २०२५ रोजी सादर करण्यात आला. मात्र, केंद्राकडून मंजुरी न मिळाल्याने केवळ महाराष्ट्रासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचा पर्याय शासन विचाराधीन असून त्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी नियम २६० अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना दिली.

#विधानपरिषदकामकाज

#दावोस येथे झालेल्या करारांबाबत (एमओयू) सभागृहात सविस्तर चर्चा व्हावी, यासाठी राज्य शासन लवकरच ‘भगवी पत्रिका’ सादर करणार आहे. या पत्रिकेत २०२२ ते २०२५ दरम्यान झालेल्या करारांची अंमलबजावणी, किती प्रकल्प कार्यान्वित झाले, किती प्रक्रियेत आहेत आणि कोणते प्रकल्प मागे आहेत याचा तपशील दिला जाणार असल्याची माहिती उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी नियम २६० अन्वये प्रस्तावाला उत्तर देताना दिली.

#विधानपरिषदकामकाज

हमीभाव खरेदीत महाराष्ट्राने सलग दुसऱ्या वर्षी देशात अव्वल स्थान मिळवले असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी नियम २६० अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना दिली.

#विधानपरिषदकामकाज,

शेतकरी कर्जमाफीबाबत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल अपेक्षित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार हे ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर करतील, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कलम २६० अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना दिली.

#विधानपरिषदकामकाज,सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत २७ हजार ९४४ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. राज्यातील रस्ते विकास कामे आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नियम २६० अन्वये प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले.

 

संबंधित पोस्ट

दृष्टिबाधित खेळाडूंना राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दृष्टिबाधित टी-20 क्रिकेट विश्वविजेत्या महिला संघातील खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्य सरकारचा मोठा निर्णय..

vishwatmaklokswamivarta

सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वीपणे राबवा – सभापती प्रा. राम शिंदे सक्षम ग्रामपंचायतींवरच महाराष्ट्राचा विकास अवलंबून – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

नव्या दिल्लीतील जेएनयू विद्यापीठ म्हणजेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठ मधली आंदोलनं आता थांबणार?