vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरुन योजनांची माहिती व लाभ घेण्याचे आवाहन

दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरुन योजनांची माहिती व लाभ घेण्याचे आवाहन

सातारा: प्रतिनिधी  दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरुन विविध योजनांची माहिती व लाभ घेणेसाठी https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन अर्ज तसेच या पोर्टलवर राज्य व केंद्र शासनाच्या एकुण १७ योजनांची माहिती लाभार्थ्यांना मिळणार आहे. दिव्यांग क्षेत्रात कार्य करणा-या संस्थांना सदर पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य असून संस्थांची नोंदणी व नुतणीकरण दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर होणार आहे.

दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजना, सेवा आणि लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी विकसित केलेले एक खिडकी प्रणाली (Single Window) डिजिटल व्यासपीठ आहे. या पोर्टलद्वारे पारदर्शक, कार्यक्षम व कालबद्ध सेवा वितरण सुनिश्चित करण्यासाठी प्रमाणित डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येतो. या पोर्टलचा मुख्य उद्देश दिव्यांगांना शासकीय कल्याणकारी सेवा सुलभपणे आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे त्याद्वारे त्यांचे साक्षमीकरण करणे हा आहे. तरी दिव्यांग व्यक्तींनी https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in या पोर्टलचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी विद्यानंद चल्लावार यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

नेदरलँड्स शिष्टमंडळाची नवी मुंबई महानगरपालिकेस अभ्यासभेट

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पुरस्काराचे रविवारी वितरण,सोहळ्यास बहुसंखेने उपस्थित राहा-प्रा.शरद वंजारे

vishwatmaklokswamivarta

पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून विभागाचा आढावा-पशुसंवर्धन विभागातील योजनांना गती देणार,पर्यावरण विभागातील कामांमध्ये लोकसहभाग घेत पर्यावरणपूरक वातावरणासाठी विशेष प्रयत्न करणार- पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी स्वीकारला पदभार

ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल आज उरणमध्ये**नागरिकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करावे*

vishwatmaklokswamivarta