vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांग व्यक्तींनी विवाह प्रोत्साहन योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

दिव्यांग व्यक्तींनी विवाह प्रोत्साहन योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी- दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक सुरक्षेसाठी विवाह प्रोत्साहन अनुदान योजनेमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तीने सक्षम (अव्यंग व्यक्तीशी विवाह केल्यास रुपये १ लाख ५० हजार एवढे अर्थसहाय्य मिळणार आहे. तर दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास रुपये २ लाख ५० हजार एवढे अर्थसहाय्य मिळणार आहे. अर्थसहाय्याची रक्कम पती व पत्नीच्या संयुक्त खात्यात DBT प्रणालीद्वारे हस्तांतरीत होणार आहे.

योजनेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे : जोडप्यातील किमान एक व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असावी. दिव्यांग व्यक्तीकडे ४० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र असावे. संबंधित व्यक्तींचा हा प्रथम विवाह असावा. घट स्फोटीत असल्यास अशी मदत यापुर्वी घेतलेली नसावी. विवाह हा कायदेशीर रित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा. विवाह झाल्यानंतर एका वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे : ४० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे आधार संलग्न वैध वैश्विक ओळखपत्र. विवाह नोंदणी दाखला. पती व पत्नीचा आधार संलग्न बँक खात्याचा सविस्तर तपशील. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र. इच्छुक अर्जदारांनी https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर अर्ज करावेत. सदर योजनेचा लाभ दि.१८ डिसेंबर २०२५ रोजी व त्यानंतर विवाह झालेल्या व्यक्तींना देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद, कार्यालयाकडे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी विद्यानंद चल्लावार यांनी केले आहे.0000

संबंधित पोस्ट

मिरज तालुक्यातील सरपंचपद आरक्षण कार्यक्रम बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे 15 जुलैला

जलजागृती पंधरवड्यानिमित्त साई एन्जेल स्कूलमध्ये जलप्रतिज्ञा 

ठाणे जिल्हा नियोजन विभागाची राज्यस्तरीय बैठक दूरदृष्यप्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न जिल्ह्यात जास्तीत जास्त लोकाभिमुख, लोकोपयोगी अन्,नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र आणि गोव्यासाठी ‘ राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्थे’च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 सार्वजनिक परीक्षांचे वेळापत्रक संस्थेकडून जाहीर

vishwatmaklokswamivarta

माझं लातूर, हरित लातूर’ अभियानांतर्गत यंदा सलग दुसऱ्या वर्षी लातूर शहरातील गंजगोलाई येथे आयोजित ‘लातूर हरितोत्सव’चे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते संपन्न

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विकास कामे होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-सिंहस्थ कुंभमेळा अविस्मरणीय करण्याची मुख्यमंत्र्यांची अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत ग्वाही…