vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गतमहिला शेतकरी गटांसाठी कृषी अवजारे बँक स्थापनेची संधी ५ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करा

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गतमहिला शेतकरी गटांसाठी कृषी अवजारे बँक स्थापनेची संधी ५ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करा

लातूर, प्रतिनिधी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (टप्पा-२) अंतर्गत ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्रसामग्री भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी “एक गाव, एक कृषी अवजारे बँक” या तत्त्वावर महिला शेतकरी गटांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत महिला स्वयंसहाय्यता गट, उमेद महिला गट किंवा महिला ग्राम संघ यांना गावस्तरावर कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा यंत्रसामग्रीवर होणारा खर्च कमी होईल आणि शेती उत्पादकता वाढेल. निवड झालेल्या महिला गटाला कमाल ४० लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. फार्मर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला शेतकरी गटांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येईल. तरी इच्छुक महिला गटांनी https://dbt-ndksp-agribusiness.mahapocra.gov.in/ या अधिकृत पोर्टलवर जाऊन ५ एप्रिल २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, प्रत्येक गावातील पात्र गटांची निवड पारदर्शक पद्धतीने केली जाईल. लातूर जिल्ह्यातील महिला गटांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक दिलीप जाधव यांनी केले आहे.

 

****

संबंधित पोस्ट

लोणार सरोवराच्या विकासकामांना गती द्या !पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश मंत्रालयात अधिकाऱ्यांची घेतली बैठक

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागातील जलस्रोतांची सुरक्षा आणि शाश्वतता दृढ करण्यासाठी जिल्हा परिषदेचा उपक्रमठाणे जिल्ह्यात ‘जेजेएम – स्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण’ विषयक प्रशिक्षणास आजपासून प्रारंभ…

vishwatmaklokswamivarta

भारतीय रेल्वे श्री गणेश उत्सवानिमित्त गणपती विशेष रेल्वेगाड्यांच्या 380 विक्रमी फेऱ्या चालवणार

शिवराज्याभिषेक सोहळा-2026 करिताजड-अवजड वाहनांकरिता वाहतुक बंदी आदेश जारी..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पायरीचे दर्शनसंत नामदेव महाराजांची पायरी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती..मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे, श्री संत चोखामेळा समाधीचे घेतले दर्शन..

बकरी ईदच्या अगोदर गोवंशाचे टॅगींग करावे*जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश