vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे
द्वितीय प्रशिक्षण संपन्न

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी:- राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२६ च्या अनुषंगाने मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे द्वितीय प्रशिक्षण दिनांक १२ व १३ एप्रिल २०२६ रोजी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील नानासाहेब पवार सभागृह व सावित्रीबाई फुले हायस्कूल येथे पार पडले. या प्रशिक्षणासाठी १ हजार ८३४ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

प्रशिक्षण स्थळी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेची सैद्धांतिक माहिती देण्यासोबतच ईव्हीएम मशीन हाताळणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देण्यात आले.

 

या प्रशिक्षणास निवडणूक निरीक्षक (भा.प्र.से) देवानंदा रेयांग, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया, निवडणूक निर्णय अधिकारी अनुप सिंह यादव, जिल्हा नोडल अधिकारी गौरी सावंत व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अमित पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रशिक्षणाची मुख्य जबाबदारी राहुरीच्या निवासी नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी पार पाडली.

हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता निवडणूक नायब तहसीलदार बडे, महसूल नायब तहसीलदार बाचकर, सर्व मंडळ अधिकारी, राहुरीचे ग्राम महसूल अधिकारी, सर्व झोनल अधिकारी व मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

27 ते 30 सप्टेंबर कालावधीत पाठ्यपुस्तक मंडळांची सर्व व्यवहार बंद

vishwatmaklokswamivarta

डॉ. पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉ येथे सरन्यायाधीशन्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार सोहळा संपन्न

सुविधा केंद्रांचे महत्वाचे योगदान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने मुंबई महानगर प्रदेशात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती· ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण· ५.५ लाख नागरिकांनी घेतला सुविधा केंद्राचा लाभ

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील सीता मातेचे जन्मस्थान असलेल्या पुनौराधाम मंदिर आणि परिसराच्या समग्र विकासासाठी केले भूमिपूजन,विरोधी पक्षांना घुसखोरांची मते हवी आहेत मात्र बिहारचे लोक याचा स्वीकार करणार नाहीत

रामनगर महसुल मंडळात आठ गावे परत सामाविष्ट करण्याची मागणी माजी आमदार अरविंद चव्हाण यांचे महसुलमंत्र्यांना निवेदन