vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राहुरी मतदारसंघात १७ व १८ एप्रिल रोजी गृह मतदानज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा…

राहुरी मतदारसंघात १७ व १८ एप्रिल रोजी गृह मतदानज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा…

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी: राहुरी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या टपाली मतदानासाठी मान्य मतदारांसाठी १७ व १८ एप्रिल २०२६ रोजी गृह मतदान प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले असून, गरज भासल्यास १९ एप्रिल हा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. ही प्रक्रिया सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुप यादव यांनी दिली.

निवडणूक प्रक्रियेत सर्वांचा सहभाग वाढवण्यासाठी व शारीरिक अडचणींमुळे मतदान केंद्रावर येणे शक्य नसलेल्या मतदारांना सुलभता निर्माण करून देण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या मतदारांनी १२-डी अर्ज भरून या सुविधेची मागणी केली आहे, त्यांनाच गृह मतदानाची सुविधा लागू राहणार आहे.

या प्रक्रियेसाठी नियुक्त प्रत्येक पथकामध्ये दोन मतदान अधिकारी, एक शिपाई, एक सूक्ष्म निरीक्षक, एक पोलीस कर्मचारी व एक व्हिडिओग्राफर यांचा समावेश असणार आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व गोपनीय पद्धतीने पार पाडली जाणार असून, नमुना १० भरून उमेदवारांनी नियुक्त केलेले मतदान प्रतिनिधीही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

विहित नोंदवहीतील पात्र मतदारांनी १७ व १८ एप्रिल रोजी आपल्या निवासस्थानी उपस्थित राहून मतदान प्रक्रियेस सहकार्य करावे. पहिल्या भेटीत मतदार घरी उपलब्ध नसल्यास पथक दुसऱ्यांदा भेट देईल, मात्र त्यानंतर मतदानाची संधी उपलब्ध होणार नाही,‌असे आवाहनही श्री.यादव यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

राज्यात नागपूरसह राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भातील काही भागात तीव्र उष्णता कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ..

विविध उपक्रमांव्दारे इतरांच्याबद्दल सेवाभाव निर्माण करा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- महाआरोग्य शिबीर उपक्रमाबद्दल धर्मादाय अधिकाऱ्यांचे केले कौतुक

vishwatmaklokswamivarta

करवंड येथे ‘ऐतिहासिक करवंड महोत्सव 2026’चे भव्य आयोजन

मापात पाप केल्यास शिक्षा अटळ;वजन-मापे अचुकतेची पडताळणी करण्याचे आवाहन

उत्तराखंड | चमोली जिल्ह्यातील पवित्र बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे आज दुपारी २:५६ वाजता हिवाळ्यासाठी बंद केले जाणार. 

vishwatmaklokswamivarta