vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्या

लेख-एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे.

लेख-एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे

विशेष प्रतिनिधी-दरवर्षीप्रमाणे 8 मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा करण्यांत येतो. या दिवशी थॅलेसेमिया आजाराची समाजामध्ये माहिती, जनजागृती व्हावी हा दृष्टीकोनातुन मार्गदर्शन करण्यांत येतो. थॅलेसेमिया हा आजार रक्ताशी संबंधीत आहे. या वर्षीची थीम ’आता लपुन न राहताः निदान न झालेल्या रुग्णांना शोधणे. दुर्लक्षित रुग्णांना आधार देणे’ “Hidden No More: Finding the Undiagnosed. Supporting the Unseen.” याची आपण अमंलबजावणी 100 टक्के केली तर निश्चितचं एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे असणारं

 थॅलेसेमिया हा आजार अनुवांशिक आहे. कारण पालकांकडुन मुलांना हा आजार होतो. सामान्य मानवाच्या शरीरामध्ये लाल रक्तपेशींचे आयुष्य 120 दिवस असते. थॅलेसेमिया या आजारामध्ये लाल रक्त पेशींचे आयुष्य 20 ते 22 दिवस असते. त्यामुळे थॅलेसेमिया ग्रस्त मुलांचे हिमोग्लोबीन कमी होत असल्यामुळे त्यांना वारंवार रक्त द्यावे लागते. हिमोग्लोबीन कमी होत असल्यामुळे थॅलेसेमिया हा धोकादायक आजार आहे. या आजारापासुन मुक्त होण्यसाठी लस किंवा औषधी उपलब्ध नाही. भारतामध्ये अंदाजे १ लाख थॅलेसेमिया रुग्ण असुन दरवर्षी 1000 रुग्णांची वाढ होतलक्षणे : अशक्तपणा, थकवा, नखे, डोळे व जीभ फिकट होणे, त्वचेवर पिवळसर रंग येणे, शारीरिक वाढ मंदावणे, ओटीपोटीत दुखणे.

प्रकार : थॅलेसेमिया या आजाराचे दोन प्रकार मेजर व मायनर आहेत. मेजर या प्रकारामध्ये पती पत्नी या दोघांच्याही गुणसुत्रामध्ये दोष असतो. मायनर या प्रकारामध्ये पती किंवा पत्नी या दोघापैकी एकाच्या गुणसुत्रामध्ये दोष असतो. पालकांच्या गुणसुत्रातील दोषामुळे थॅलेसेमिया हा आजार होतो. याचे रोग निदान रक्त तपासणीद्वारे होते.

उपचार : बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा एकमेव खर्चिक उपचार आहे किंवा नियमित 20 ते 25 दिवसांनी बालकांना बाहेरुन रक्त देणे. तज्ज्ञ वैद्यकिय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित उपचार घेणे.

आवाहन : वेळेवर निदान, उपचार आणि प्रतिबंध या त्रिसुत्रीचा वापर करण्यासाठी जनजागृती करु या.डॉ. जयश्री भुसारे)  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालन

00000

संबंधित पोस्ट

विधानपरिषद प्रश्नोत्तर :एच. आर. महाविद्यालयातील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला आजपासून सुरुवात*नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; मुंबई, महाराष्ट्राला अधिक शक्ती देणारा अर्थसंकल्प प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेने निर्धारपूर्वक पाऊल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta

आरोग्य – सामाजिक क्षेत्रातील संस्थांच्या सहकार्याने आरोग्य सेवा तळागाळात पोहोचणार – डॉ. स्वानंद सोनारजिल्ह्यातील ६८ स्वयंसेवी संस्था, रुग्णालय प्रतिनिधींची बैठकनिरामय अहिल्यानगर अभियान’वर सविस्तर चर्चा

आयुष्मान भारत योजना तळागाळापर्यंत पोहोचवा – डॉ. ओमप्रकाश शेटे

vishwatmaklokswamivarta

गौण खनिजःअवैध उत्खनन व वाहतूक रोखणार स्थिर पथके;३९ ठिकाणी पथके तैनात करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta