vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ठाणे ग्रामीण जिल्ह्यात आज 15 मे पासून प्रतिबंधात्मक आदेश लागू

ठाणे ग्रामीण जिल्ह्यात आज 15 मे पासून प्रतिबंधात्मक आदेश लागू

ठाणे, प्रतिनिधी: आगामी बकरी ईद सण, विविध राजकीय पक्षांची आंदोलने आणि नेत्यांचे दौरे यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी केले आहेत. हे आदेश दिनांक 15 मे 2026 रोजी दुपारी 12.00 वाजेपासून ते 30 मे 2026 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत संपूर्ण ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात लागू राहतील.

ठाणे ग्रामीण जिल्ह्यात सध्या विविध राजकीय संघटनांकडून मोर्चे, रॅली आणि आंदोलने केली जात आहेत. तसेच, दिनांक 27 मे 2026 रोजी बकरी ईदचा सण साजरा होणार असून, जिल्ह्यातील सुमारे 94 ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय नमाज पठणासाठी एकत्र येण्याची शक्यता आहे. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडून सामाजिक शांतता धोक्यात येऊ नये, या उद्देशाने प्रशासनाकडून ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार पुढील कृत्यांवर कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे. शस्त्र बाळगणे: तलवार, भाले, दंडे, बंदुका, सुरी, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बाळगण्यास सक्त मनाई आहे. स्फोटक पदार्थ: कोणताही क्षारक (Acid) किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेणे प्रतिबंधित आहे. दगड व क्षेपणास्त्रे: दगड किंवा इतर फेकून मारता येतील अशी साधने जमा करणे अथवा त्यांचा प्रचार करणे. प्रक्षोभक प्रदर्शन: व्यक्तीचे प्रेत, आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. घोषणाबाजी व भाषणे: सार्वजनिक ठिकाणी सभ्यता व नीतिमत्तेस बाधा येईल अशी भाषणे करणे, प्रक्षोभक गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे अथवा अशा प्रकारचे फलक व चिन्हे प्रदर्शित करणे. जमावबंदी: सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदींनुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकास प्रकल्पांचा उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

लोकशाहीच्या बळकटीकरणात मतदारांचा सहभाग महत्त्वाचा -जिल्हाधिकारी किशन जावळे,राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणुकीत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

vishwatmaklokswamivarta

विभागीय आयुक्त श्री. दिलीप गावडे यांनी केली पाणीपुरवठा योजनेची पाहणी…

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील सीता मातेचे जन्मस्थान असलेल्या पुनौराधाम मंदिर आणि परिसराच्या समग्र विकासासाठी केले भूमिपूजन,विरोधी पक्षांना घुसखोरांची मते हवी आहेत मात्र बिहारचे लोक याचा स्वीकार करणार नाहीत

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना-नवी मुंबई  क्षेत्रातील आणि कामोठे व खारघर नोड मधील पाणी पुरवठा बंद राहील तसेच शुक्रवार दि. 07 मार्च 2025 रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.