vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिवसेना शिष्टमंडळाने घेतली नुतन पोलीस अधिक्षकांची भेट

शिवसेना शिष्टमंडळाने घेतली नुतन पोलीस अधिक्षकांची भेट

जालना, (प्रतिनिधी)-जालना जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्याशिष्टमंडळाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात यथोचित सत्कार करुन कायदाव सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव, जिल्हाप्रमुख महेशनळगे, जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम,हनुमान धांडे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रुपम घुगे, शहरप्रमुख दीपक

ननवरे,महेश पुरोहित, राजेंद्र जैस्वाल, अनिस पठाण,फैझान मिर्झा,बळीरामकोल्हे,देवजी जर्‍हाड,भक्त मात्रे,सुदाम काळे,शिवाजी कर्‍हाळे,अंकुशवाघ,अमजत मिर्झा,शिवाजी सोरमारे,सुभाष अरसूळ,इलिया कांबळे,दत्तू नन्नावरे,राजेंद्र जर्‍हाड,सुभाष काटकर आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू यांच्याशी जालना शहरामधील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. शहरातील वाढतीगुन्हेगारी, बेशिस्त वाहतूक, अवैध धंदे, भाईगिरी, शाळा-महाविद्यालये वशिक्षण संस्था समोर उभे राहून तरुण मुलीं व विद्यार्थिनींना त्रास देणारेरोडरोमिओं यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. तसेच सामान्य माणसाला न्याय मिळावा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकासव्हावा, या दृष्टीने सविस्तर चर्चा झाली. संधू यांच्या मार्गदर्शनाखालीजिल्हा नक्कीच भयमुक्त आणि सुरक्षित राहील, असा विश्वास व्यक्त केला

००००

संबंधित पोस्ट

मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने हाहाकार! 🌧️ हवामान विभागानं मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी केला राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत ….

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत ई-केवायसी करण्याची दि.३० एप्रिल पर्यंत संधी उपलब्ध 

गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रेतून जलसंवर्धनाच्या कार्याला नवसंजीवनी देण्याचा संकल्प – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील-गोदा ते नर्मदा अहिल्यादेवी जलयात्रा’ ही प्रभावी ठरणार – प्रा. राम शिंदे

पेंच अभयारण्यातील न्यू तोतलाडोह गावातील पुनर्वसनामुळे विस्थापित झालेल्या लोकांना नियमाप्रमाणे सर्व सुविधा देण्यात याव्यात, अशा सूचना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थाचे योगदान महत्त्वपूर्ण- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

खामगाव एमआयडीसीत एलपीजी गॅस गळतीचे ‘महा-मॉकड्रिल’ यशस्वीजिल्हा प्रशासनाच्या आपत्ती सज्जतेची मोठी चाचणी विविध यंत्रणांचा उत्स्फूर्त सहभाग