vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी 3 ठिकाणी धाड, 9 सिलेंडर जप्त- पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार फिरत्या पथकाची कारवाई

इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी 3 ठिकाणी धाड, 9 सिलेंडर जप्त- पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार फिरत्या पथकाची कारवाई

 सांगली, प्रतिनिधी : सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमिवर जिल्ह्यात एलपीजी सिलेंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी फिरत्या दक्षता पथकांचा पहारा ठेवण्यात येत आहे. या पथकांमार्फत 3 ठिकाणांवर धाड टाकून तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये एकूण 9 सिलेंडर जप्त करण्यात आले असून, सदरील व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे.

सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमिवर जिल्ह्यात एलपीजी सिलेंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा विभागामार्फत नियुक्त फिरत्या दक्षता पथकांनी घरगुती गॅस सिलिंडर अवैधरीत्या वापरणाऱ्यांवर निर्बंध लादण्यासाठी धाडींचे प्रमाण वाढवले आहे. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

 घरगुती एलपीजी गॅसचे सुरळीत वितरण व्हावे तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर दक्षता व फिरते पथक नियुक्त करण्यात आले आहे. गॅस एजन्सीकडून सिलिंडरचा गैरमार्गाने पुरवठा केल्याचे आढळल्यास अथवा घरगुती एलपीजीचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

00000

संबंधित पोस्ट

शिवराज्याभिषेक सोहळा-2025 करिता जड-अवजड वाहनांकरिता वाहतुक बंदी आदेश जारी

गडचिरोलीच्या मनोरंजन क्षेत्रात नवा अध्याय – वातानुकूलित सिनेमागृहाचे उद्घाटन-राज्यात नगरपालिका क्षेत्रातील पहिले मॉडेल सिनेमा थिएटर गडचिरोलीत सुरू

सफाई कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा पुरवाव्यात- आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

शहीद बाळकृष्ण निकम यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून सांत्वन शासनाकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नंदा मुंदे यांना सेंद्रिय शेतीतील जैविक इंडियन हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta

सियाल इंडिया २०२५ मध्ये ‘उमेद’चा डंका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे ‘उमेद’ महिलांची उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचणार